Posts

Showing posts from July, 2025

सोशल मिडियावरील गृप की "गृपारिझम"?

सोशल मिडियावरील गृप की "गृपारिझम"? (प्रत्येक ग्रुपमधल्या मनमिळावूपणाची आणि मत व मनभेदाची सत्यकथा) Sunil Pune TM "गृप"  हा शब्द खूप सामान्य वाटतो, पण त्यामागचं जग मात्र खूप वेगळं आणि गुंतागुंतीचं असतं. सुरुवात होते ती केवळ ३–४ जिवलग मित्र-मैत्रिणींनी एकत्र येऊन गप्पा मारायच्या, आठवड्यातून एकदा भेटायचं, वाढदिवस, सण साजरे करायचे असा एक सकारात्मक, मनाला समाधान देणारा हेतू घेऊनच,  पण जसजसं सदस्यसंख्येचं प्रमाण वाढत जातं, तसतसे विचारांचे, दृष्टिकोनांचे, स्वभावांचे फरक समोर यायला लागतात. ज्यांनी गृप सुरू केला, त्यांची एकत्रित भावना, मैत्रीचा ओलावा काहीसा विरून जातो..याच प्रक्रियेला मी "गृपारिझम" असं नाव देतो  जिथे "गृप" हा शब्द फक्त नावापुरता राहतो आणि "इझम" म्हणजे एक विचारधारा, एक कल, एक वेगळं वळण घेण्याची सुरुवात होते. गृपारिझमची लक्षणं काय? गृपामध्ये जेव्हा सदस्यांच्या भावना, मतं, अपेक्षा यांचं टकराव होतो, तेव्हा गैरसमजांचं वावटळ सुरू होतं. कोणी कोणावर काही बोललं, कोणाचं रिप्लाय न आला, कोणाच्या जोकला हसावं का रागवावं... हे सगळं एकमेकांबद्दल...

"परिस्थिती आणि माणसं, आपलेपणाची खरी परीक्षा!"

"परिस्थिती आणि माणसं,  आपलेपणाची खरी परीक्षा!" लेखक  सुनिल पुणे TM "हे पटणार नाही, पण सत्य हेच की लोक आपली परिस्थिती पाहूनच आपल्याशी संबंध जोडतात..." हे वाक्य जितकं कटू आहे, तितकंच ते सत्यही आहे. पण हे सत्य फक्त अर्धंवट आहे. कारण यात माणसांची स्वार्थी बाजू दिसते, पण दुसरी बाजूही आहे  ती समजून घ्यायला हवी. आपण सगळेच हे अनुभवलेलं असतं. जेव्हा आपण यशाच्या शिखरावर असतो, तेव्हा सगळे "आपले" वाटतात. फोन वाजतात, कौतुक होतं, खांद्यावर थाप दिली जाते, आणि प्रत्येकाला आपल्या यशात थोडीशी जागा हवी असते. आपण एखादा मोठा करार जिंकतो, छान फोटोशूट करतो, नाव येतं तेव्हा "आपण आहे म्हणून" लोक येतात. पण… एकदा का परिस्थिती उलटी झाली, व्यवसाय थोडा डगमगला, आर्थिक चक्र थांबलं, थोडं मागे पडलो, की हीच मंडळी अनोळखी होतात. ज्यांनी आपल्याला "भाऊ", "मैत्र" किंवा "सर" म्हणून हाक मारली होती, ते हळूहळू मूक होतात. काहीजण तर आपल्याला टाळतातही. का? कारण त्यांना आपली परिस्थिती नकोशी वाटते. त्यांच्या नजरेत ‘status’ महत्वाचा असतो, माणूस नाही. पण सगळेच असे नस...

"36 गुण जुळणे" म्हणजे काय?

"36 गुण जुळणे" म्हणजे काय?  आपण नेहमी ऐकतो, "36 गुण जुळले का?" पण हे गुण फक्त मुलीचे असतात का? नाही! 👉 हे गुण वधू आणि वर  दोघांच्या कुंडलीतील असतात. जन्म, वेळ, स्थळ यावरून दोघांच्या कुंडल्या मॅच करून एकूण 36 गुणांपैकी किती गुण जुळतात ते पाहिले जाते. 🌟 अष्टकूट मिलान नावाची प्रणाली आहे, जी 8 प्रकारांमध्ये हे गुण मोजते जसे की स्वभाव, आरोग्य, संतती, मानसिक जुळव, शारीरिक सुसंगतता इत्यादी. ✅ 18 गुणांपेक्षा कमी – लग्नास अयोग्य ✅ 18 ते 24 – मध्यम ✅ 25 ते 32 – उत्तम ✅ 33 ते 36 – सर्वोत्तम जुळव पण लक्षात ठेवा... 🌹 गुण जुळणे हे एक मार्गदर्शन आहे, अंतिम सत्य नाही. खरे जुळव असते ते प्रेम, समजूतदारपणा आणि परस्पर सन्मान. 🙏 आपल्या आयुष्यातला जोडीदार निवडताना केवळ गुण नव्हे तर "मनाचे गुण" अधिक महत्त्वाचे! सुनिल पुणे TM, 9359850065, sunilpunetm.blogspot.com

"सासू-सून यांचेही 36 गुण जुळायला हवेत! जसे वधु-वराचे असतात"

"सासू-सून यांचेही 36 गुण जुळायला हवेत! जसे वधु-वराचे असतात" लेखक सुनिल पुणे TM 8007939422 लग्न जमवताना आपण वधू-वराचे 36 गुण जुळतात का हे पाहतो... पण एक महत्वाचे, गुणमिलनाचा विषय आपण विसरतो सासू आणि सून यांचे गुण किती जुळतात? हो, ऐकायला थोडं वेगळं वाटेल, पण ही मांडणी प्रत्येक घरासाठी आणि प्रत्येक स्त्रीसाठी खूप उपयोगी आहे.  कारण सासूबाई आणि सून यांचे गुण का जुळावेत बर ? कारण जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीशी जोडली जाते, जी सासू  तिच्या आईसारखी असावी अशी अपेक्षा असते, आणि दुसरीकडे एक आई पुत्राच्या निवडीला स्वीकारून सूनेला लेकीसारखं मानण्याचा प्रयत्न करते. पण या नात्यातही काही "गुण" जुळायला हवेतच, ज्यामुळे हे नातं फुलतं, बहरतं आणि घराला खऱ्या अर्थानं ‘गृहसौख्य’ लाभतं. सासू-सून यांचे "अदृश्य गुण" कोणते असावेत? यासाठी आपण थोडं वेगळेपणाने "36 गुणमिलन" करूया, ज्यात खालील गुणाचा विचारात करू यात. समजूतदारपणा असावा, एकमेकांच्या चुका स्वीकारण्याची तयारी असावी व ऐकून घेण्याची कला ही फक्त बोलणं नाही तर ती ऐकणंही महत्त्वाचं आहे. एकमेकींवर विश्वास, शंका न करता ...

"समजूतदार नात्यांचा गाभा काय तर स्त्री आणि पुरुष यांच्यातील परस्पर समज"

*"समजूतदार नात्यांचा गाभा काय तर स्त्री आणि पुरुष यांच्यातील परस्पर समज"* (सुनिल पुणेTM 8007939422) आजच्या डिजिटल युगात आपण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खूप पुढे आलो आहोत, पण या प्रगतीच्या गडगडाटात एक गोष्ट हळूहळू हरवत चालली आहे  ती म्हणजे "मनाच्या गाभ्याची समज". विशेषतः स्त्री आणि पुरुष यांच्यातील नातेसंबंधांमध्ये ही समज अजूनही तितकीशी रुजलेली नाही, जितकी असायला हवी. पुरुषाने स्त्रीच्या मनाचा गाभा समजून घेणे हे फक्त तिच्या भावना समजणे नव्हे, तर तिच्या विचारांचा, तिच्या धडपडीचा आणि तिच्या अबोल वेदनांचा सन्मान करणे होय. ती कधी आई असते, कधी पत्नी, कधी बहीण आणि कधी सखीही असते  पण प्रत्येक भूमिकेत ती प्रेम देते, समर्पण करते आणि न बोलता खूप काही सहन करते. स्त्रीच्या नाजूक मनाला आणि तिच्या स्वप्नांना आदराने हात लावणं, तिच्या अस्तित्वाचं कौतुक करणं हे खऱ्या अर्थाने पुरुषत्व आहे. पण याच वेळी हे देखील तितकंच खरं आहे की, स्त्रीनेही पुरुषाच्या भावविश्वाला समजून घेणं गरजेचं आहे. पुरुषांमध्ये भावना कमी आहेत असं म्हणणं चुकीचं आहे. अनेकदा ते गप्प राहतात, पण त्यांच्यामध्येही भीती, अप...

"आपुलकीच्या नात्यांना दुसऱ्याच्या शब्दांनी नात्यातील विश्वास फाटू देऊ नकोस..."

"आपुलकीच्या नात्यांना दुसऱ्याच्या शब्दांनी नात्यातील विश्वास फाटू देऊ नकोस..." सुनिल पुणे TM 8007939422 प्रिय  माणसाला नात्यांमध्ये गुंतवणं हे नैसर्गिक आहे, पण ते नातं जपणं मात्र एक कला आहे. आणि दुर्दैवाने आजच्या काळात ही कला हरवत चालली आहे... विशेषतः जेव्हा आपण आपलं मन दुसऱ्याच्या म्हणण्यावर ठेऊन, आपल्या अगदी जवळच्या माणसांपासून दुरावतो. माझं एकच सांगणं आहे  दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या आपुलकीची माणसं तोडू नका...कारण हे जग कधीच निष्पाप नव्हतं. जगाची जुनी सवयच आहे की काडी टाकून आग लावायची, आणि मग स्वतः शांतपणे त्या आगीत उब घेत बसायचं! कोण किती जवळचं आहे, हे तुम्हाला समजत असताना कुणाच्या तरी बोलण्याने त्या नात्यावर शंका घेणं,  ही आपल्या माणसांवर अन्यायच ठरतो. आपण आपलेपणाने नातं जोपासतो, त्यात ओल ठेवतो, भावना गुंतवतो… आणि कुणीतरी एकतर्फी सांगितलेलं काहीतरी ऐकून आपणच फूट घालतो? हा न्याय आहे का? आज तुम्ही जर एखाद्या आपुलकीच्या माणसापासून फक्त राग, गैरसमज किंवा कुणाच्या बोलण्यामुळे दूर झालात… तर कदाचित उद्या तुम्हालाच समजेल की ज्याचं नुकसान झालंय ते तुमचंच आहे. कारण... नात्...

स्त्रीचं समजून घेणं आणि खरं प्रेम, एक नाजूक समर्पण

स्त्रीचं समजून घेणं आणि खरं प्रेम, एक नाजूक समर्पण लेखक – Sunil Pune TM "इतरांना समजावून सांगण्यापेक्षा स्वतःला समजावून सांगणं सोपं असतं", ही ओळ जशी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर लागू होते, तशीच ती एका प्रेमळ स्त्रीच्या जीवनात खोलवर रुतलेली असते. एक स्त्री जेव्हा प्रेम करते, तेव्हा ती अपेक्षा करत नाही, फक्त समजून घेण्याची इच्छा बाळगते. पण दुर्दैव म्हणजे, तिचे खरे प्रेम अनेकदा गैरसमजाच्या वादळात अडकते. ती समजून घेण्याच्या प्रयत्नात स्वतःला पूर्णपणे विसरते आणि अखेर आपल्याच अस्तित्वाचा बळी देते. ती कुठलाही प्रसंग बोलून व्यक्त करत नाही, ती केवळ नजरेतून, कृतीतून, आपल्या छोट्या छोट्या सवयींतून भावना दाखवते. पण समोरच्याने त्या भावना समजून घ्याव्यात, अशी तिची मूक अपेक्षा असते. जेव्हा हे अपेक्षांचे ऋणानुबंध गैरसमजात गुंततात, तेव्हा ती स्त्री कुणावरही दोष न देता स्वतःलाच बदलते...आणि हेच तिचं समर्पण असतं! इथेच तिचाच बळी जातो. कधी कधी, एक साधा शब्द, एक स्पष्ट संवाद, किंवा एक विश्वासाचं हसणं हे खूप काही सांगू शकलं असतं, पण पुरुष समजून घ्यायच्या आधीच नातं तुटलेलं असतं. कारण  "ज्याला ...

आजारी पतीचे पत्नीस शेवटचे पत्र

* आजारी पतीचे पत्नीस शेवटचे पत्र....सुनिल पुणे TM 8007939422. * प्रिय सखी, प्रिय पत्नी, अखेरची वेळ जवळ आली आहे, हे आता स्पष्ट जाणवतंय. श्वास आता हळूहळू मंदावत चाललाय... आणि त्याच प्रत्येक श्वासात तुझं प्रेम साठून राहिलंय. हे पत्र तुला तेव्हाच मिळेल, जेव्हा मी या जगात नसेन. पण प्रत्येक ओळीतून, प्रत्येक शब्दातून, मी तुझ्या जवळ असणार आहे. आपण दोघांनी मिळून हा संसार फुलवला. तुझ्या प्रेमाने, सहनशीलतेने, आणि हसऱ्या चेहऱ्याने प्रत्येक अडचण पार केलीस. आज हे सगळं आठवताना, माझ्या डोळ्यांतून अश्रू येतात… पण ते दु:खाचे नाहीत, कृतज्ञतेचे आहेत. तू माझी सावली झालीस, कधी आईसारखी काळजी घेतलीस, कधी सखी बनून माझ्या मनातलं ओझं हलकं केलंस, कधी माझ्या चुका समजून घेत तुझं मौन बोलकं केलंस. तुला सोडून जाणं हीच माझी सर्वात मोठी हतबलता आहे. माझ्या अनुपस्थितीत, तू स्वतःला सावरशील अशी मला पूर्ण खात्री आहे… पण तरीही माझं मन अस्वस्थ होतं कारण तुला एकटं सोडून चाललोय. माझ्यानंतरही तू स्वतःची काळजी घे. वेळेवर खा, विश्रांती घे… कारण हे सगळं सांगणारा आता तुझ्या आजूबाजूला नसेल. पण माझं अस्तित्व तुझ्या म...

आयुष्याला लाभलेली प्रेमाची, पुण्याईची फळे…

आयुष्याला लाभलेली प्रेमाची, पुण्याईची फळे…सुनिल पुणे TM 8007939422 आयुष्यात अनेक नाती येतात… काही आपली असतात, काही केवळ नावापुरती. पण कधीतरी एक असा जीव भेटतो… जो तुमच्यावर मनापासून प्रेम करतो. कोणताही स्वार्थ न बाळगता, कोणतीही अपेक्षा न करता... फक्त आणि फक्त तुमच्यासाठी जगणारा. तो किंवा ती तुमच्यावर प्रेम करतो म्हणजे काय हो ? तर तुमच्यासाठी वेळ राखून ठेवतो, तुमच्या पाठीमागे सतत उभं राहतो, तुमचा रागही प्रेमानं सहन करतो, तुमच्या यशात फुलतो आणि तुमच्या अश्रूंना स्वतःच्या डोळ्यांत सामावतो. स्त्रीचं प्रेम कसे तर,  ते मुळापासून निःस्वार्थ असतं. ती जेव्हा प्रेम करते तेव्हा ती तिचं सगळं अस्तित्व त्यात ओतते. ती फक्त तुमची सखी नाही तर ती तुमचं सुख-दुःख ओळखणारी एक सजीव भावना असते. ती तुमच्या सवयींमध्ये रमते, तुमच्या चुकांवर प्रेम करते, आणि तुमच्या प्रत्येक क्षणात स्वतःला गुंफून टाकते. पुरुषाचं प्रेम कसे तर,  ते जरा अबोल असतं, पण खोलवर रुजलेलं असतं. तो कदाचित रोज "आय लव्ह यू" म्हणणार नाही, फोन करणार नाही, पण त्याच्या कृतीतून ते प्रेम ओसंडतं. तुमच्यासाठी धावत येणं, तुमच्या चेहऱ्यावर हास्य...

हॅल्लो ! आजच्या डिजिटल युगात, "तुम्ही खरोखर श्रीमंत आहात का?" तपासून बघा.

*हॅल्लो ! आजच्या डिजिटल युगात, "तुम्ही खरोखर श्रीमंत आहात का?" तपासून बघा..* (लेखक: Sunil Pune TM 8007939422) श्रीमंती म्हणजे काय? लाखों-करोडो रूपयाचे बॅलन्स असलेली बँक खाती? एसी गाड्या, आलिशान बंगले, नोकर-चाकर, परदेशवारी, दर पावला गणिक मिळणारी वाह वाह ? खरंच, श्रीमंतीचं मोजमाप एवढंच असतं का? माझ्या महाविद्यालयाच्या काळातील एक साधा पण एक विलक्षण विचार देणारा अनुभव मला आजही आठवतो. आमच्या एका  प्राध्यापकांनी वर्गात एक फार वेगळाच प्रश्न विचारला तो असा की,  “शून्य 0 म्हणजे काय? (इंफिनिटी) अनंत म्हणजे काय? आणि हे दोघं कधी सारखे होऊ शकतात का?” सगळा वर्ग चमकला. काहींनी लगेच उत्तरं दिली ती अशी, शून्य म्हणजे काहीही नाही आणि अनंत (इंफिनिटी) म्हणजे मोजता न येणारी एक मोठी संख्या असते....प्राध्यापक थोडं हसले आणि म्हणाले, “शून्य म्हणजे ‘फार थोडं’ आणि (इंफिनिटी) अनंत म्हणजे ‘फार जास्त’. पण हे दोघं एकाच वेळी कसे असू शकतात हे समजून घ्या.” त्यांनी एक गोष्ट सांगितली ती अशी,  एका अशिक्षित गुराख्याला मोजता येतं फक्त वीसपर्यंत. जर त्याच्या कळपात ५, १०, १५ मेंढ्या असतील तर तो नेमका आकडा सांगतो....

*"स्त्रीने स्वतःसाठी तरी थोडं थांबायलाच हवं..."*

*"स्त्रीने स्वतःसाठी तरी थोडं थांबायलाच हवं..."* सुनिल पुणेTM 8007938422 स्त्री... एक अशी व्यक्तीजी आपल्या कुटुंबासाठी, नवऱ्यासाठी, मुलांसाठी, सासर-मायकेसाठी, समाजासाठी सतत झटत असते. पण या धावपळीत ती स्वतःसाठी थांबत नाही... स्वतःच्या शरीराच्या गरजा, मनाच्या भावना, आपल्या लाडाची इच्छाही ती गिळून टाकते. ती फक्त "देणारी" होते... पण "घेणारी" मात्र कधीच होत नाही. विचार करा एकदा... जर झाडालाच वेळेवर पाणी, खत, काळजी दिली नाही, तर ते झाड फुलणार कसं? तसंच, जर स्त्रीने स्वतःचं आरोग्य, मानसिक शांती, मनाचे हक्काचे विचार, आणि शरीराच्या नैसर्गिक गरजांकडे दुर्लक्ष केलं, तर ती कशी ताजीतवानी आणि आनंदी राहील? आज अनेक स्त्रिया जीवनाच्या तणावात, थकव्याने, मानसिक ओझ्याने, आजाराने ग्रासलेल्या दिसतात. कारण त्या सतत "सगळ्यांकरता" झटतात... पण स्वतःसाठी नाही! मग होतं काय? डॉक्टर, टेस्ट्स, औषधं, हॉस्पिटल्स यांचा जीवनात शिरकाव होतो. मग ती 'सर्वांच्या आधारस्तंभ' स्त्री हळूहळू 'सर्वांची काळजीची जबाबदारी' बनते. या अवस्थेवर उपाय काय? तर.. स्वतःसाठी थोडं थांबा! त...

"पुरुषाचंही एक 'माहेर' असावं..."

*"पुरुषाचंही एक 'माहेर' असावं..."* लेखक – सुनिल पुणे TM 9359850065 जसं स्त्रीसाठी माहेर म्हणजे आधाराचं, मायेचं आणि मन मोकळं करतं घेण्याचं ठिकाण असतं, तसंच पुरुषासाठीही काहीतरी असायला हवं ना? स्त्रीला माहेरी जाताना डोळे भरून येतात – कारण ती तिथं "ती" असते, सून, बायको, आई हे सगळं न विसरता फक्त "मुलगी" म्हणून मोकळी होते. पण पुरुषाला हे स्वातंत्र्य, हा निवांतपणा फारसा मिळत नाही. संकटं असो की ताणतणाव – तो पुरुष "मजबूत" असण्याच्या समाजाच्या कल्पनेखाली गप्प बसतो. त्याला ना रडण्याची मुभा असते, ना थकण्याची. तो आयुष्यभर फक्त "जबाबदारी" पेलत राहतो. आई-वडील म्हातारे झाले की त्यांचा आधार, बायकोसाठी कणा, मुलांसाठी हिरो, समाजासाठी यशस्वी माणूस – पण तो स्वतःसाठी कोण? उदाहरण द्यायचं झालं, तर आपल्या रोजच्या आयुष्यातले कितीतरी पुरुष असे असतात  जसे शरदकाका, जे नोकरी संपल्यानंतर गावाकडं परतले, पण घरच्यांना त्यांची गरज उरलीच नव्हती. ना कुणी बोलायला, ना कुणी ऐकायला. एक दिवस मनातलं सगळं दाबून ठेवून आजारी पडले आणि नंतर... कायमचे निघून गेले. दुसरं उदाहरण...

"पुरुषांचंही मन असतं… ते जपा!"

"पुरुषांचंही मन असतं… ते जपा!" सुनिल पुणेTM यांच्या शैलीत, 8007939422 जगातील अनेक सर्व्हे सांगतात की जसं महिलांवर तणाव आहे, तसाच तणाव आता पुरुषांवरसुद्धा वाढत चाललाय...कुटुंब, करिअर, जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि स्वतःच्या भावना हे सगळं सांभाळताना पुरुष पण कुठे तरी ‘स्तब्ध’ होत चालले आहेत. पण एक लक्षात ठेवा... ‘सर्व पुरुषांनो ! तुम्ही "पुरूष आहे म्हणून सर्वकाही सहन करावं लागतं'’ ही मानसिकता आता बदलली पाहिजे! आजच्या युगात भारतीय पुरुषांनीही स्वतःच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं झालं आहे.  तर चला... भारतीय पुरुषांनी स्ट्रेस कमी करण्यासाठी खालिल ह्या ‘पाच महत्वाच्या गोष्टी’ लक्षात ठेवाव्यात... 1) "बिनशर्त पुरूषार्थ" म्हणजे सर्व सहन करणे नव्हे! तुम्ही एखाद्या गोष्टीने त्रस्त असाल, मनात सल असेल, तर ती व्यक्त करा. तुमचंही हसणं, रडणं, थकणं, चुकणं हे मान्य आहे. पुरुष म्हणजे बिनभावनांचा यंत्र नव्हे... तुम्हीही माणूस आहात, ते स्विकारलं पाहिजे! 2) तुमचं कर्तृत्व तुमच्या मन:शांतीच्या किंमतीवर नको! नोकरीत प्रमोशनसाठी जीव तोडून काम करताय पण कुटुंब, शरीर, मन व...

"स्त्री" नशिबवान पुरुषाच्या जीवनातली हिरकणीचे वरदान असते........

"स्त्री" नशिबवान पुरुषाच्या जीवनातली हिरकणीचे वरदान असते.............. सुनिल पुणेTM 8007939422 पुरुषाच्या आयुष्यात जर एक प्रामाणिक, प्रेमळ, समजूतदार अशी हिरकणी स्त्री नशिबाने आली, तर ते केवळ नातं राहत नाही, ते एक ईश्वरी देणगी ठरतं. ही स्त्री केवळ जोडीदार नसते, ती जीवनदायिनी शक्ती असते. तिच्या अस्तित्वामुळे पुरुषाचं आयुष्य एका वेगळ्याच प्रकाशमान मार्गावर प्रवास करतं. ही स्त्री त्याला समजून घेते, आधार देते, प्रत्येक वळणावर विश्वासाने त्याचा हात धरते. आजच्या धावपळीच्या, मतलबी आणि गोंधळलेल्या जगात जर अशी स्त्री आयुष्यात आली, तर ती केवळ सुंदर शरीर नसून सुंदर मनाचं, नितळ प्रेमाचं, समर्पणाचं प्रतिबिंब असते. ती पुरुषाच्या स्वप्नांना बळ देते, त्याच्या अपयशाच्या क्षणी डोळे पुसते, आणि त्याच्या यशात फुलांइतकी हसते. प्रेमाने भरलेली साथ मिळाल्यावर जग जिंकायला किती वेळ लागतो हो? काही दिवसांत पुरुषाचं जीवनच बदलतं. जीवनातील कपड्यापासून विचारांपर्यंत, हृदयापासून धनसंपत्तीपर्यंत हे सगळं उजळून निघतं. कारण ही स्त्री फक्त जोडीदार नाही, ती त्याची प्रेरणा असते, गुरु असते, जीवनाची दिशा दाखवणारी दीपस्...

"काळाच्या उन्हात पोसलेली स्त्री खरंच अनमोल असते…"

"काळाच्या उन्हात पोसलेली स्त्री खरंच अनमोल असते…" सुनिल पुणेTM 8007939422 जशी आगीच्या झळांतून द्राक्ष सुकून किशमिश होते, तशीच स्त्री ही अनुभवांच्या वाळवंटातून जाऊन अधिक मोलाची होते. मातीला आकार दिला, तापवून मडके बनवलं जाते, तसंच स्त्रीही जीवनाच्या आगीत तापून घराची सुखद सावली बनते. ती जन्मते जेव्हा मुलगी म्हणून, मनात स्वप्नं, डोळ्यांत चमक घेऊन. नंतर सून होते, पत्नी होते, आई होते, आणि या सगळ्या भूमिकांमध्ये ती स्वतःला हरवून घेते, पण इतरांना सावरण्यात ती धन्यता मानते. तीच्या डोळ्यांत अश्रू असले तरी चेहऱ्यावर हास्य असतं. ती थकते, पण थांबत नाही. ती झिजते, पण तक्रार करत नाही. ती मोडते ही, पण पुन्हा उभी राहते. स्त्रीचं खरं सौंदर्य तिच्या रूपात नाही, तर तिच्या सहनशीलतेत आहे, तिच्या समजूतदारपणात आहे, आणि काळाच्या कसोटीत तावून सुलाखून निघालेल्या तिच्या अस्तित्वात असतं. जशी मातीचे मडकं होते तेव्हा पाणी साठवते, तशीच स्त्रीही आठवणी, भावना आणि कष्ट साठवते सगळ्यांसाठी. तिच्यावर कधी टीका होते, अपेक्षा ही लादल्या जातात, पण तरीही ती घराचा आधार बनून उभीच राहते. स्वतःचं दुःख बाजूला ठेवून इतरांसा...

स्त्रीचं अंतरंग… एक न बोललेली कहाणी...

स्त्रीचं अंतरंग… एक न बोललेली कहाणी...  सुनिल पुणे TM 8007939422... ती... एक साधी भारतीय स्त्री. लग्नाआधी बाबांचं लाडाचं पिल्लू, भावाच्या भांडणातल्या माफीचा पुल, आईची सावली, आणि मैत्रिणींसाठी नेहमी हसरी. ती जिवंत होती, मनमोकळं बोलणं, स्वप्न रंगवणं, नव्या कपड्यांची हौस, नव्या पुस्तकांचा सुगंध, आणि आयुष्यभरासाठी एक सच्चा प्रेमी शोधणं... पण लग्नानंतर ती हळूहळू 'ती' राहिली नाही. ती "त्यांची पत्नी" झाली, "मुलांची आई" झाली, "घराची सून" झाली... पण स्वतःसाठी काहीच राहिलं नाही. काळाच्या ओघात ती संसाराच्या गाड्याला पाठीवरून ढकलत राहिली. मुलं मोठी झाली. घरात सुखसुविधा वाढल्या. पण तिच्या मनात एक खिन्न शांतता घर करून बसली खरोखर सर्व असुन ही  "आपलं कोण आहे ?" ती बोलू शकत नाही. कारण कोण ऐकणार?....ती रडू शकत नाही. कारण कोण पुसणार?...ती व्यक्त होऊ शकत नाही. कारण "घरातल्या बाईला इतकं काय कमी आहे?" असं म्हणणारे सगळीकडे आहेत. तिचा प्रत्येक दिवस "तू समजशील ना?" या अपेक्षेवर सुरू होतो, आणि "कोणालाही काही फरक पडत नाही" या विचारावर ...

"पुरुषाचं मोल केवळ पैशातच का?"

"पुरुषाचं मोल केवळ पैशातच का?" लेखक  Sunil Pune TM 9359850065 आजच्या घडीला समाजात एक स्पष्ट, पण न बोललेलं वास्तव दिसतं की, पुरुषाची किंमत ठरते ती त्याने किती पैसे कमावले यावरून व तो मुलगा किती मोठ्या पगाराच्या नोकरीत आहे, त्याचा व्यवसाय किती मोठा आहे, त्याच्या बँक खात्यात किती शिल्लक आहेत, हेच निकष त्याच्या प्रतिष्ठेचे आणि आदराचे बनतात. लग्नाचं उदाहरण घ्या. आजही अनेक घरांत मुलीच्या नातेवाईकांचा पहिला प्रश्न असतो, "मुलगा किती कमावतो?" त्याच्या स्वभावापेक्षा, विचारांपेक्षा, माणूस म्हणून त्याच्या गुणांपेक्षा महत्व दिलं जातं त्याच्या पगाराला. हाच दृष्टिकोन मग मित्रमंडळींमध्ये, नातेवाईकांमध्ये आणि कुटुंबातही दिसतो, जो जास्त पैसे कमवतो, तोच श्रेष्ठ ठरतो. पण या पैशाच्या गणनेत पुरुषाच्या भावना, संघर्ष, मानसिक तणाव, कधी हार-मार यांचं काय? घरासाठी झिजणाऱ्या, स्वतःच्या इच्छा मागे टाकणाऱ्या, अपयश पचवूनही पुन्हा उठून चालणाऱ्या पुरुषाचं खऱ्या अर्थाने मूल्यमापन केवळ पैशात करणं अन्यायकारक नाही का? पुरुषही माणूस आहे. त्यालाही थकवा येतो, त्यालाही आधार हवा असतो, त्यालाही भावनिक मूल्या...

"प्रेमाचं वय नसतं… काळ ठरवतो कोण येईल आपल्या आयुष्यात!"

*"प्रेमाचं वय नसतं… काळ ठरवतो कोण येईल आपल्या आयुष्यात!"* सुनिल पुणे TM 9359850065 वय कितीही असो, प्रेमाला त्याचं बंधन कधीच नसतं… कधी कोणी आपल्या हृदयात जागा कशी बनवतं, हे आपणही ओळखत नाही  ते काळ ठरवतो. जात, पात, धर्म, पैसा किंवा वय  या गोष्टी प्रेमात आड येतीलच असं नाही. बघा ना फिल्म इंडस्ट्री किंवा क्रिकेटमधील काही जोड्यांकडे  वयाचं अंतर खूप असूनही त्यांचं प्रेम फुललेलं आहे… टिकलेलं आहे… कारण प्रेम हे आकड्यांत मोजायचं नसतं  ते मनामनांत उमलतं! आपण लहानपणापासून ऐकत आलोय  "प्रेमात सर्व माफ असतं!" पण खरंतर प्रेम टिकवायचं कसं, जपायचं कसं  ही खरी कसोटी असते दोघांची. प्रेमात समज, संवाद, समर्पण आणि विश्वास असतो, आणि हेच घटक एक सुंदर नातं घडवतात. आजचं वास्तव सांगतं  प्रेमाला वयाचं बंधन नाही, फक्त मनं जुळणं गरजेचं! तुमच्या प्रेमकहाणीला प्रणाम…! सुनिल पुणेTM 8007939422. sunilpunetm.blogspot.com

लग्न करतांना काळा नवरा करावा, कारण डिजिटल युगातील गोऱ्या नव वधूंसाठी खास सुचना!

लग्न करतांना काळा नवरा करावा, कारण डिजिटल युगातील गोऱ्या नव वधूंसाठी खास सुचना! लेखक: सुनिल पुणे TM 9359850065 पूर्वीच्या काळी मुलींसाठी नवरा शोधताना विचारायचं, "सरकारी नोकरी आहे का?" आजच्या डिजिटल युगात विचारलं जातं की  "नेटफ्लिक्स पासवर्ड शेअर कराल का?" पण या सगळ्या प्रश्नांपेक्षा एक प्रश्न जरा जास्त महत्त्वाचा आहे…तो म्हणजे... "नवर्‍याचा रंग किती काळा आहे?" हो हो, चुकूनसुद्धा हसू नका! हे नवीन संशोधन माझे आहे सुनिल पुणेTM चे,  "काळा नवरा = सुरक्षित संसार !" जेव्हडा काळा नवरा असेल तर सुखी संसार कसा ?  यामध्ये काय संबंध आहे ? तर काळ्या नवर्‍याला इतर पोरी व बायका भाव देत नाहीच आणि बिचारा नवरा आपल्या सुदर्शन गोऱ्या बायकोच्या प्रेमात इतका गढून जातो की. स्वतःचं पावित्र्य तो Google Drive सारखं लॉक करून ठेवतो! त्यामुळे कुठलीही पोरगी त्याला “Hi” म्हटलं तरी तो बिचारा “Hi BP?” समजतो! इन्स्टाग्राम फेमिनिस्ट नाहीतर ‘Reel Queen’ पोरींच्या जाळ्यात हे नवरे कधीच अडकतच नाहीत....त्यांना माहीत असतं, आपण जर कुठे "heart react" केलं, तर बायकोचा slipper reac...

शुगर डॅडी आणि शुगर मॉम : आजच्या डिजिटल युगातील एक श्रीमंत ‘नवीन निवड’ की भावनिक भरकटलेपणाचा मार्ग?

शुगर डॅडी आणि शुगर मॉम : आजच्या डिजिटल युगातील एक श्रीमंत ‘नवीन निवड’ की भावनिक भरकटलेपणाचा मार्ग? लेखक : सुनील पुणे TM 8007939422 डिजिटल युगाने माणसाचे आयुष्य सहज, सोयीचे आणि जलद केले, पण याच युगाने नात्यांमध्ये वेगळी कलाटणी दिली. आज समाजात 'शुगर डॅडी' आणि 'शुगर मॉम' ही संकल्पना फक्त विदेशी चित्रपटांत किंवा वेबसिरीजमध्येच राहिलेली नाही, तर आपल्या आजूबाजूच्या डिजिटल विश्वात उघडपणे वावरत आहे. शुगर डॅडी आणि शुगर मॉम म्हणजे काय? शुगर डॅडी म्हणजे असा आर्थिकदृष्ट्या सक्षम पुरुष जो स्वतःपेक्षा खूप लहान वयाच्या मुलीशी 'भावनिक' किंवा 'काही ठिकाणी शारीरिक' नातं ठेवतो, त्या बदल्यात तिच्या शिक्षणाची, राहणीमानाची, हॉटेलिंग, गिफ्ट्स यांची जबाबदारी घेतो. शुगर मॉम म्हणजे हीच गोष्ट उलट असते  एक श्रीमंत, वयस्कर स्त्री एका तरुण मुलाशी जवळीक ठेवते आणि त्याच्या स्वप्नांचा आर्थिक भार उचलते. का होतेय ही निवड? आजची तरुणाई Instagram, Tinder, Bumble सारख्या अ‍ॅप्सवर नात्यांचा शोध घेत असताना, प्रेमपेक्षा ‘लाइफस्टाईल’ आणि ‘सिक्युरिटी’ महत्त्वाची वाटू लागली आहे. दुसरीकडे, काही शुगर...

एकतर्फी प्रेम... आशा आणि निराशेच्या छायेतलं एक गूढ नातं...

एकतर्फी प्रेम... आशा आणि निराशेच्या छायेतलं एक गूढ नातं...सुनिल पुणेTM 8007939422 प्रेम कधी स्पष्ट शब्दांत बोललं जातं, तर कधी मौनातच सर्वकाही सांगून जातं. काही नाती अशी असतात, जी समाजाच्या चौकटीत बसत नाहीत, पण तरीही ती इतकी शुद्ध, निरागस आणि हृदयात खोल रुतलेली असतात की त्यांची तुलना कुणाशीच करता येत नाही. नील आणि ती… त्यांच्या वयाच्या पन्नाशीनंतरच हे नातं आकार घेऊ लागलं. सुरुवात झाली एका साध्याशा संवादाने , लेखाने, कधी एखाद्या कामासाठी केलेला कॉल, एक साधा मेसेज… पण ते संवाद जसजसे वाढत गेले, तसतसं नातं खोल जाऊ लागलं. नीलचा आत्मविश्वास होता, तो बिनधास्त बोलायचा, मजेत. नकळत तो बोलून गेला एक मराठी गाण्यातून  "I love you!" आणि त्या शब्दांनी तिच्या मनात सगळं काही उलथं पालथं झालं. तीने त्याला सांगितलं, "गुंतू नको रे..." पण खरं तर तीच त्याच्या शब्दांमध्ये, त्याच्या हसण्यात, त्याच्या आठवणीत हळूहळू गुंतत चालली होती. दोघंही ५०० किलोमीटर दूर होते, पण हृदयात एकमेकांसाठी जागा मात्र अगदी हळुवार होत होती, अगदी ह्रदयाच्या जवळची! तिला वाटायचं की, "मी आधी का सांगू? तोच म्हणाला ना...

स्वातंत्र्य की स्वैराचार?

*कथा: स्वातंत्र्य की स्वैराचार?* लेखक: Sunil Pune TM 8007939422,  गावाकडील सुनिल नावाचा मुलगा पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिक्षणासाठी आला. घरच्या चांगल्या संस्कारात वाढलेला सुनिल थोडासा गोंधळलेला होता, पण अभ्यासात लक्ष केंद्रित करून तो स्वतःला सिद्ध करायच्या तयारीत होता. शहराचं वेगळं वागणं, बोलणं, राहणं  सगळंच त्याच्यासाठी नवीन होतं. पण त्याने संयम ठेवला. कॉलेजमध्ये त्याची ओळख झाली तनिषा नावाच्या एका आधुनिक विचारसरणीच्या मुलीशी. सुरुवातीला ती सुनिलच्या साधेपणावर हसायची, पण हळूहळू त्याच्या शांत, समजूतदार स्वभावाकडे तिचं लक्ष गेलं. दोघांमध्ये मैत्री वाढली, वेळ घालवणं सुरू झालं आणि तीच मैत्री प्रेमाच्या दिशेने वळू लागली. एक दिवस तनिषाने थेट सुनिलला विचारलं, "तुला माझं खरंच आवडतंय ना? मग आपल्या प्रेमात अंतर काय हवं?" सुनिल आश्चर्यचकित झाला. त्याच्या डोक्यात प्रेम म्हणजे लग्न, जबाबदारी, एक नातं  तर तनिषासाठी प्रेम म्हणजे जवळीक, भावनिक आणि शारीरिक दोन्ही. तनिषाने त्याला तिच्या रूमवर बोलावलं. वातावरण रोमँटिक होतं, पण त्या क्षणी सुनिल थोडा गोंधळला. तरीही भावनेच्या ओघात तो थांबला न...

बापाचा हात कायम हातात धरला तर, जगात कोणाचे ही पाय धरायची गरजच पडत नाही

*बापाचा हात कायम हातात धरला तर, जगात कोणाचे ही पाय धरायची गरजच पडत नाही* लेखक : सुनिल पुणे TM 8007939422 "बाप"... या शब्दातच एवढं सामर्थ्य आहे की ज्याचं वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. आपण जन्मतो, पावलं टाकतो, बोलायला शिकतो, शिक्षण घेतो, मोठं होतो, पण या प्रत्येक टप्प्यावर एक सावली आपल्यासोबत असते कायम.. ती म्हणजे बापाची सावली. आणि म्हणूनच मी म्हणतो, *"बापाचा हात कायम हातात धरला तर, जगात कोणाचेही पाय धरायची गरजच पडत नाही."* बाप म्हणजे फक्त पोट भरणारा, खर्च पुरवणारा, शिस्त लावणारा माणूस नाही. तो आपल्या मुलांच्या आयुष्याचा पहिला शिक्षक असतो, मार्गदर्शक असतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधारस्तंभ असतो. अनेक वेळा आपण बापाकडे पाहतो तेव्हा तो कमी बोलणारा, कठोर वाटणारा माणूस दिसतो. पण त्याच्या नजरेत, त्याच्या कष्टात आणि त्याच्या प्रत्येक कृतीत एकच गोष्ट असते ती म्हणजे आपल्या लेकरांचं सुख. बापाचा हात म्हणजे आत्मविश्वास. छोटं मूल जेव्हा पहिल्यांदा उभं राहतं, तेव्हा कोणाचा आधार घेतं? तर बापाचा. जेव्हा आयुष्यात एखादं अपयश येतं, तेव्हा आपल्या खांद्यावर कोणाचा हात हवा असतो ? तर...

लग्न न झाल्यामुळे कोणी मरत नाही, पण चुकीच्या व्यक्तीशी लग्न झाल्यावर मात्र,

लग्न न झाल्यामुळे कोणी मरत नाही, पण चुकीच्या व्यक्तीशी लग्न झाल्यावर मात्र, रोज थोडं थोडं मरावं लागतं… सुनिल पुणे TM 8007939422 लग्न म्हणजे दोन जीवांचं नातं, दोन कुटुंबांचं एकत्र येणं, आणि आयुष्यभरासाठीचा एक नाजूक पण जबाबदारीचा निर्णय. पण आज या समाजात स्त्रीवरच अधिक दबाव असतो तिच्या लग्नाच्या वयाचं, समाजाच्या नजरेचं, "कधी करणार?" या प्रश्नांचं ओझं. आणि मग, अनेकदा ती समाजाचं म्हणणं ऐकते, पण तिचं मन ऐकत नाही. ती स्वतःला समजावत राहते… "सगळेच परफेक्ट नसतात, थोडं सामजस्य हवं," "आई-बाबांचा मान ठेवावा लागतो," "कधीतरी सवय होईल…" …पण चुकीच्या व्यक्तीशी लग्न झालं की, सवय तर होते, पण ती सवय नसते तर ती फक्त  शरीराने जिवंत, पण आत्म्याने हरवलेली अवस्था असते. प्रेमाचा उबदार हात नसेल, संवादाची साथ नसेल, समजून घेण्याची नाती नसतील, आणि सतत फक्त अपेक्षा, अपेक्षा, अपेक्षा… तेव्हा स्त्री, जी मुळातच प्रेमासाठी, मायेच्या स्पर्शासाठी तळमळते… ती दिवसेंदिवस आतून कोसळत जाते. ती घर सजवते, पण घरात आपलेपण नाही वाटत. ती हसते, पण डोळ्यातील चमक हरवलेली असते. ती जेवण वाढते, पण ति...

आई ! म्हणजे काय तर वेदनेपूर्वीची पहिली आरोळी…

*आई म्हणजे काय तर वेदनेपूर्वीची पहिली आरोळी…* लेखक: सुनिल पुणे TM 8007939422 आई... हा एक शब्द नाही, ती एक अख्खी सृष्टी आहे. आई म्हणजे केवळ जन्म देणारी नव्हे, तर तीच तर आहे ती "वेदनेपूर्वीची पहिली आरोळी", जी मूल होण्यापूर्वीच जन्म घेत असते आपल्या अंत:करणात. आई म्हणजे निसर्गाचा जिवंत स्पर्श. तिचं पोट हे एक देवघर… आणि त्या देवघरात वाढणारं बाळ म्हणजे तिचं अनंत पूजन. जगातील कोणत्याही ग्रंथात इतकी गहिरी भाषा नाही, जितकी आईच्या मूक डोळ्यात असते. ती वेदनेने तुकडे झाली तरी स्वतःचा चेहरा हसतमुख ठेवते, कारण तिच्या चेहऱ्यावरच बाळाचं आयुष्य उमलतं. आई म्हणजे एका उदात्त सूरात गायलेलं जीवनाचं भजन. तीच पहिली आरती, पहिलं झुलपगीत, पहिला धीर देणारा स्पर्श आणि पहिली "भितीवर मात करणारी" ताकद! तिच्या कुशीत झोपताना वाटतं की हेच तर खरं स्वर्ग, आणि तिला मिठीत घेताना वाटतं की देव खरंच आपल्यातच असतो. आईची माया ही असते अशी की... तिचं "पोट दुखतं" आपल्याला ताप आल्यावर, तिचं "हृदय मोडतं" आपल्या मनात निराशा भरली की, तिची "निद्रा हरपते" जेव्हा आपण मनातल्या गोष्टी बोलत न...

"ती... तडजोडीत हरवलेली एक जीवन कविता"

*"ती... तडजोडीत हरवलेली एक जीवन कविता"* लेखक: सुनिल पुणे TM 8007939422 "ती" कोण आहे? कधी आई, कधी बहीण, कधी पत्नी वा प्रेयसी, कधी सून, कधी मुलगी, कधी सहकारी... पण स्वतःसाठी ती कधीच ‘फक्त एक स्त्री’ राहू शकली नाही. प्रत्येक नातं ती निभावते, प्रत्येक जबाबदारी तिनं हसत घेतली. तिला शिकवण्यात आलं आहे की.. "तू एकत्र ठेवणारी आहेस, तू तुटलीस तर घर मोडेल." पण तिला कोणी विचारलंच नाही, "तू ठेच लागल्यावर कुणाच्या खांद्यावर डोकं ठेवशील?" ती रोज हरवते असते.. स्वतःच्या आयुष्यातून, स्वतःच्या आवडीतून, स्वतःच्या ओळखीतून… पण कुणालाच तिचा शोध घ्यावासा वाटत नाही. तिचा संसार म्हणजे एका न दिसणाऱ्या मनोऱ्यावर उभा केलेला किल्ला असतो, जिथे तिच्या इच्छा विटा होतात, आणि त्यावरच दुसऱ्यांच्या अपेक्षांचा गिलावा चढतो. ती शिकलीय की समजून घ्यायचं काम हे तिचंच, माफ करायचं काम तिचंच, थांबायचं, वाट बघायचं, समजूत काढायचं… सगळं तिचंच. कारण समाजाच्या मते तिचं आयुष्य हे तिचं नाहीच – ते तिच्या घरासाठी, नात्यांसाठी, संस्कृतीसाठी दिलेलं एक “बलिदान” आहे. तडजोड ही तिच्या बांगड्यांइतकीच सहज स्...

"नशिबात जर फक्त दुखंच लिहिलं असेल तर." पुढे काय ?

*"नशिबात जर फक्त दुखंच लिहिलं असेल तर..."* सुनिल पुणे TM 8007939422 "जर माझ्या नशिबात फक्त दुखच लिहिलं असेल, तर मी काय करू? मी तुमच्याशी भांडण करून जिंकू शकते हो, पण या जिद्दी 'जिंदगी'सोबत लढायचं कसं जिंकू कसं ?" ही शब्दं एका थकलेल्या, तुटलेल्या, पण अजूनही उभ्या असलेल्या स्त्रीच्या हृदयातून निघाली होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच स्तब्ध हास्य होतं की, जसं प्रत्येक वेदनेनं गालावर एक रेषा कोरलेली असावी आणि डोळ्यांमधून अश्रूंना रस्ता मोकळा करून दिला असावा. ती कोण होती? कोणत्याही घरातल्या अंगणात खेळणारी एक चिमुकली मुलगी... वडिलांच्या खांद्यावर बसून आकाशाला गवसणी घालणारी स्वप्नवेडी... लग्नाच्या वेळी आनंदानं थरथरणारी साडी... आई झाल्यावर झोप न घेता बाळाला झोपवणारी... आणि एक दिवस अचानक घराच्या कोपऱ्यात, स्वतःशीच कुजबुजणारी... "मी आहे तरी कोण?" ती कुणाच्या जिवनात 'आई' झाली, कुणाच्या आयुष्यात 'पत्नी', कुणाच्या मते 'सून' तर कधी प्रेयसी, कुणाच्या साठी 'कामवाली', पण स्वतःच्या आयुष्यात मात्र एक 'गुप्त वेदना' बनली... दु:ख? ...

"स्त्री जन्मा, तुझी अधुरीच एक कहाणी..."

"स्त्री जन्मा, तुझी अधुरीच एक कहाणी..." लेखक – सुनिल पुणे TM 8007939422 ती एक हुशार मुलगी होती… डोळ्यांत मोठी स्वप्नं, मेंदूत बुद्धिमत्तेचा प्रकाश, आणि हृदयात आईवडिलांच्या स्वप्नांचं ओझं… सैनिकी घरात जन्मलेली. लहानपणापासून शिस्तीत वाढलेली. अभ्यासात ती इतकी हुषार की शिक्षकही तिच्या उत्तरांनी अचंबित व्हायचे. १२वीपर्यंत सायन्समध्ये उत्तम गुणांनी शिक्षण घेतलं… पण वडिलांच्या एका निर्णयाने आयुष्याचा प्रवाहच बदलून गेला. त्यांच्या इच्छेनुसार FYBCom ला प्रवेश घेतला… पण दुसऱ्या वर्षातच म्हणजे SYBCom करत असतानाच तिचं लग्न लावून देण्यात आलं. ती विरोध करू शकली नाही, कारण मुलींना निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य फार कमी वेळा दिलं जातं… तिने मनातली स्वप्नं गिळली, आणि सासरी पाऊल टाकलं. लग्नानंतर तिचं नवीन आयुष्य सुरू झालं… पण ते स्वप्नवत नव्हतं, ते वास्तव होतं… एकाच खोलीत 6 जण राहत होते. तिथंच खाणं, तिथंच झोपणं, तिथंच संसार. हनीमूनचं स्वप्न तिने मनातच पाहिलं होतं, पण प्रत्यक्षात तेही चोरूनच झालं… जणू एखाद्या गुन्ह्यासारखं. लग्ना नंतर काही दिवसांतच नंणद बाळंतपणासाठी माहेरी आली. जागेचा प्रश्न गंभीर ...

"नम्रतेची वाटचाल - मुंगीपासून ते स्त्रीपर्यंत"

"नम्रतेची वाटचाल - मुंगीपासून ते स्त्रीपर्यंत" लेखक – सुनिल पुणे TM 8007939422 "मुंगी"  हे एक लहानसं पण अतिशय विचार करायला लावणारं जीवशास्त्र आहे. तिचा आकार जरी क्षुल्लक वाटला, तरी तिचा जीवनमार्ग मोठ्या शिकवणीसारखा असतो. वाटेत कोणी अडथळा आणला, तरी ती कुठेच तक्रार करत नाही, ना कुणावर रागावते, ना कुणाला दोष देते. फक्त नम्रतेने बाजूची वाट शोधते आणि पुन्हा आपल्या मार्गावर अविरत चालत राहते. विश्रांती नाही, थांबणं नाही, फक्त कार्य, कर्तव्य आणि चिकाटी! म्हणूनच कदाचित तिच्या तोंडात कायम गोड साखर पडते. हीच गोडी तिच्या स्वभावाची फळं असते. हीच गोष्ट आपण समाजातील एका स्त्रीच्या आयुष्यातही पाहतो. आई, बहीण, पत्नी, सून, सासू, शिक्षिका, सेविका, प्रेमिका कुठलाही रोल असो, स्त्री नेहमीच आपल्या कर्तव्याला प्राधान्य देते. अडथळे आले, समस्या आल्या, टीका झाली तरीही ती कोणालाही दोष न देता, शांतपणे मार्ग शोधते. कुटुंबासाठी, समाजासाठी, मुलांकरिता ती वाट काढते. आपल्या इच्छांना, मनाला बाजूला ठेवून ती इतरांसाठी समर्पित असते. स्त्रीचा स्वभावही मुंगीप्रमाणे नम्र असतो. तिला तिच्या कर्तव्यांची जाणीव...