Posts

सेवानिवृत्ती: आयुष्याचा संध्याकाळ नव्हे, तर आत्मशोधाचा सुवर्णकाळ....!

सेवानिवृत्ती: आयुष्याचा संध्याकाळ नव्हे, तर आत्मशोधाचा सुवर्णकाळ....! लेखक: सुनिल पुणेTM 93598 50065  मानवी आयुष्याचा प्रवास हा ऋतूंसारखा असतो. बालपणाचा वसंत, तरुणपणाचा उन्मेष, प्रौढत्वाची जबाबदारी आणि शेवटी येणारा परिपक्वतेचा शांत, संयमी काळ. सेवानिवृत्ती म्हणजे या प्रवासाचा शेवट नसतो; उलट ती आयुष्याला नव्या दृष्टीने पाहण्याची, स्वतःला नव्याने शोधण्याची आणि जगण्याचा खरा अर्थ अनुभवण्याची एक सुंदर संधी असते. नोकरीच्या काळात माणूस आपल्या पदाशी, अधिकाराशी आणि ओळखीशी इतका एकरूप होऊन जातो की त्यालाच स्वतःचे अस्तित्व समजू लागते. अनेक वर्षे कार्यालय, व्यवसाय, जबाबदाऱ्या आणि धावपळ यांच्यात गेलेली असतात. पण एक दिवस असा येतो, जेव्हा त्या साऱ्या जबाबदाऱ्यांचा अध्याय संपतो आणि जीवन एका नव्या वळणावर येऊन उभे राहते. सेवानिवृत्तीनंतर सुरुवातीच्या काही वर्षांत माणसाला जाणवू लागते की ज्या संस्थेत, कार्यालयात किंवा क्षेत्रात त्याने आयुष्याची अनेक वर्षे घालवली, ते जग आता त्याच्याशिवायही सुरळीत चालत आहे. कालपर्यंत ज्याच्या निर्णयांना महत्त्व होते, त्याला आता एक सामान्य नागरिक म्हणून पाहिले जाते. ही वस...

समागम तीचा निर्णय, त्याची जबाबदारी आणि नात्याचं खरं रूप.

समागम तीचा निर्णय, त्याची जबाबदारी आणि नात्याचं खरं रूप....लेखक सुनिल पुणेTM 9359850065. प्रेम, लग्न आणि जीवनसाथी या नात्यांमध्ये जे दिसतं तेच खरं असतं असं आपण मानतो, पण वास्तव त्याहून खूप खोल असतं. अनेक नाती बाहेरून व्यवस्थित दिसतात, पण आतून हळूहळू तुटत असतात. त्यामागचं कारण एकच नसतं, पण एक महत्त्वाचा आणि अनेकदा दुर्लक्षित राहणारा भाग म्हणजे लैंगिकतेबद्दलची समज आणि त्यातली जबाबदारी. लैंगिक संबंध होतील की नाही, हा निर्णय केवळ स्त्रीचा असतो. कारण तिचं शरीर, तिचं मन आणि तिच्या भावनांवर तिचाच पूर्ण अधिकार असतो. तिला केव्हा, कसं आणि कोणासोबत जवळीक साधायची हे ठरवण्याचं स्वातंत्र्य तिचं असतं आणि ते तसं असायलाच हवं. हा फक्त अधिकार नाही तर तिच्या स्वाभिमानाचा, तिच्या सुरक्षिततेचा आणि तिच्या अस्तित्वाचा भाग आहे. ती जेव्हा कोणावर विश्वास ठेवते आणि त्या नात्यात स्वतःला पूर्णपणे समर्पित करण्याचा निर्णय घेते, तेव्हा तो केवळ एक शारीरिक क्षण नसतो. तो तिच्या आयुष्यातील एक मोठा भावनिक टप्पा असतो. पण इथून पुढे नातं कसं वळण घेतं, हे अनेकदा पुरुषाच्या वागण्यावर अवलंबून असतं. कारण लैंगिक संबंधानंतर नातं के...

"बॉयफ्रेंड शोधताना हृदय, नवरा शोधताना कॅल्क्युलेटर!"

Image
लग्न करायला चांगला नवरा मिळत नाही, मग बॉयफ्रेंड कसे मिळतात ?  लेखक सुनिल पुणेTM 93598 50065  आजकाल अनेक मुलींच्या तोंडी एक वाक्य हमखास ऐकायला मिळतं  "लग्नासाठी चांगला मुलगा मिळत नाही हो!" हे वाक्य ऐकलं की माझ्या मनात नेहमी एक साधा प्रश्न उभा राहतो  मग बॉयफ्रेंड कसे मिळतात? कारण कॉलेजपासून ऑफिसपर्यंत, बसस्टॉपपासून सोशल मीडियापर्यंत, मित्र शोधण्याची प्रक्रिया अगदी वेगाने चालू असते. फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली जाते, इंस्टाग्रामवर लाईक्सची देवाणघेवाण होते, व्हॉट्सअॅपवर गुड मॉर्निंगची फुले उमलतात आणि काही दिवसांत "फक्त मित्र" हा शब्द "स्पेशल फ्रेंड" पर्यंत पोहोचतो. तेव्हा कुणी उंची मोजत नाही, पगाराची स्लिप मागत नाही, बँक बॅलन्स तपासत नाही किंवा स्वतःचं घर आहे का याची चौकशी करत नाही. पण ज्या क्षणी लग्नाचा विषय निघतो, तेव्हा अचानक सगळे निकष जागे होतात. मुलगा उंच हवा, पगार मोठा हवा, स्वतःचं घर हवं, चारचाकी हवी, सवयी चांगल्या हव्यात, व्यसन नसावं, सासू-सासरे समजूतदार हवेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलगा देखणा हवा! म्हणजे थोडक्यात सांगायचं तर, ...

कुटाना

Image
"कुटाना" – एक शब्द, हजार संशय ! लेखक : सुनिल पुणेTM 93598 50065  मराठी भाषेतील काही शब्द असे असतात की त्यांचा शब्दकोशात अर्थ शोधायला जाऊ नका. कारण त्यांचा खरा अर्थ लोकांच्या चेहऱ्यावर, नजरेत आणि कुजबुजीत सापडतो. त्यापैकीच एक भन्नाट शब्द म्हणजे  "कुटाना". हा शब्द कानावर पडला की समोरच्याच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित उमटतं. कुणी सरळ अर्थ सांगत नाही, पण सगळ्यांना अर्थ कळलेला असतो. गावातील चौक असो, शहरातील कट्टा असो किंवा व्हॉट्सॲप ग्रुप असो, एखाद्या व्यक्तीच्या नावापुढे "कुटाना" हा शब्द जोडला की चर्चेला उधाण येतं. खरं तर हा शब्द जन्माला येतो तो संशयातून. नवरा जरा जास्त फोनवर बोलू लागला, पत्नी अचानक सजूनधजून बाहेर जाऊ लागली, मोबाईलला पासवर्ड लागला, रात्री उशिरा "ऑफिसचं काम" वाढलं की समाजातील काही स्वयंघोषित गुप्तहेर लगेच निष्कर्ष काढतात "काहीतरी कुटाना चाललंय!" आपल्या समाजात एक गंमत आहे. लोकांना स्वतःच्या घरातील गळणारा नळ दिसत नाही, पण शेजाऱ्यांच्या घरातील पडदा जरा हलला तरी त्यामागची कथा तयार होते. आणि मग अफवांचा कारखाना सुरू होतो....

शरीरसंबंधा पलीकडील प्रेमळ जीवन !

शरीरसंबंधा पलीकडील प्रेमळ जीवन, लेखक : सुनिल पुणेTM, 93598 50065, दि.30 मे 2026. प्रेम म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर प्रथम येते ती आकर्षणाची भावना. दोन व्यक्तींमधील जवळीक, स्पर्श, भेटीगाठी आणि शरीरसंबंध. पण प्रेमाचा खरा अर्थ इतकाच मर्यादित असतो का? खरं तर प्रेमाचा महासागर शरीराच्या किनाऱ्यापाशी थांबत नाही; तो मन, भावना, विश्वास, समर्पण आणि आत्मीयतेच्या अथांग गाभाऱ्यापर्यंत पोहोचलेला असतो. जगात अनेक नाती अशी असतात जी शरीराने दूर असली तरी मनाने अतूट जोडलेली असतात. एखाद्या व्यक्तीचा फक्त आवाज ऐकून दिवस उजळून निघतो, तिच्या एका संदेशाने चेहऱ्यावर हसू फुलते, तिच्या दुःखाने आपले डोळे ओलावतात आणि तिच्या आनंदाने मन भरून येते. ही जी भावना असते, ती केवळ शरीरसंबंधांवर आधारलेली नसते. ती असते आत्म्याला स्पर्श करणाऱ्या प्रेमाची. खरे प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीचा अधिकार गाजवणे नव्हे, तर तिच्या अस्तित्वाचा सन्मान करणे. तिच्या स्वप्नांना पंख देणे, तिच्या अपयशात तिच्या पाठीशी उभे राहणे आणि यशात तिच्यासाठी टाळ्या वाजवणे. प्रेम म्हणजे फक्त हातात हात घेऊन चालणे नाही, तर अंधारात तिच्यासाठी दीपस्तंभ होण...

“मन रिकामं झालं की माणूस बाहेर आधार शोधू लागतो.

“मन रिकामं झालं की माणूस बाहेर आधार शोधू लागतो. ” लेखक: सुनिल पुणेTM 93598 50065  लग्न झालं, संसार सुरू झाला, मुलं झाली म्हणजे आयुष्यात प्रेमाची गरज संपते असं अजिबात नसतं. उलट त्या टप्प्यावर माणसाला अधिक भावनिक आधाराची गरज असते. कारण जबाबदाऱ्या वाढतात, ताण वाढतो आणि आयुष्य हळूहळू धावपळीचं बनतं. अशा वेळी जोडीदाराकडून मिळणारा आदर, जिव्हाळा, समजून घेणं आणि दोन प्रेमाचे शब्द माणसाला आतून उभारी देतात. पण अनेकदा संसार सांभाळताना हीच गोष्ट नकळत हरवत जाते. आज अनेक घरं बाहेरून सुखी दिसतात. सगळं व्यवस्थित असतं  घर, पैसा, मुलं, जबाबदाऱ्या. पण त्या घरात मनाने जवळ असणं हरवलेलं असतं. संवाद कमी होतो, एकमेकांना वेळ देणं कमी होतं आणि नातं फक्त रोजच्या कामापुरतं उरतं. “काय हवं ? ”, “जेवलास का?” इतकाच संवाद उरतो. पण माणसाला फक्त सुविधा नको असतात, त्याला भावना हव्याच असतात. काही वेळेला पुरुष असो किंवा स्त्री, त्यांना घरात सतत दुर्लक्ष मिळतं. त्यांचं बोलणं ऐकलं जात नाही, भावना समजून घेतल्या जात नाहीत. फक्त चुका दाखवल्या जातात किंवा जबाबदाऱ्या आठववल्या जातात. अशावेळी माणूस आतून एकटा पडतो. आणि जेव्ह...

बाई, बाटली आणि शबाब

"बाटली, बाई आणि शबाब" ! ही तीन शब्दं फक्त व्यसनाची ओळख नाहीत, तर माणसाच्या मनात चालणाऱ्या युद्धाची तीन रूपं आहेत. एका बाजूला मोह, दुसऱ्या बाजूला एकटेपणा आणि तिसऱ्या बाजूला स्वतःपासून पळण्याची धडपड..... लेखक सुनिलTM 93598 50065  बाटली, बाई आणि शबाब जेव्हा शहरात रात्र होते,  तेव्हा काही दिवे फक्त रस्ते उजळत नाहीत, ते अनेक आयुष्यांची अंधारी कहाणी लपवत असतात. एखादा माणूस हातात बाटली घेऊन बसलेला दिसतो तर लोक म्हणतात,  “दारुड्या आहे तो.” पण कुणी त्याच्या डोळ्यांत डोकावून पाहत नाही. कारण तिथे अनेक अपूर्ण स्वप्नं पडलेली असतात. काही पुरुषांना “बाईच्या मागे वेडे” म्हणतात. पण प्रत्येक आकर्षणामागे वासना नसते, कधी कधी ती मायेची भूक असते, जी त्याला आयुष्यभर कुणाकडूनच मिळालेली नसते आणि “शबाब” तो फक्त तारुण्याचा नशा नसतो, तर स्वतःला जगात सिद्ध करण्याचा उन्माद असतो. ज्यात माणूस स्वतःलाच हरवून बसतो. "बाटली" कधीच कोणाला बुडवत नाही तर माणूस आधीच आतून बुडालेला असतो. बाटली फक्त त्याला काही क्षणांसाठी विसरायला शिकवते. जगात प्रत्येक नशेबाजाच्या मागे एक तुटलेलं नातं, एक हरलेलं प्रेम, किंवा ...