“मन रिकामं झालं की माणूस बाहेर आधार शोधू लागतो.
“मन रिकामं झालं की माणूस बाहेर आधार शोधू लागतो. ” लेखक: सुनिल पुणेTM 93598 50065 लग्न झालं, संसार सुरू झाला, मुलं झाली म्हणजे आयुष्यात प्रेमाची गरज संपते असं अजिबात नसतं. उलट त्या टप्प्यावर माणसाला अधिक भावनिक आधाराची गरज असते. कारण जबाबदाऱ्या वाढतात, ताण वाढतो आणि आयुष्य हळूहळू धावपळीचं बनतं. अशा वेळी जोडीदाराकडून मिळणारा आदर, जिव्हाळा, समजून घेणं आणि दोन प्रेमाचे शब्द माणसाला आतून उभारी देतात. पण अनेकदा संसार सांभाळताना हीच गोष्ट नकळत हरवत जाते. आज अनेक घरं बाहेरून सुखी दिसतात. सगळं व्यवस्थित असतं घर, पैसा, मुलं, जबाबदाऱ्या. पण त्या घरात मनाने जवळ असणं हरवलेलं असतं. संवाद कमी होतो, एकमेकांना वेळ देणं कमी होतं आणि नातं फक्त रोजच्या कामापुरतं उरतं. “काय हवं ? ”, “जेवलास का?” इतकाच संवाद उरतो. पण माणसाला फक्त सुविधा नको असतात, त्याला भावना हव्याच असतात. काही वेळेला पुरुष असो किंवा स्त्री, त्यांना घरात सतत दुर्लक्ष मिळतं. त्यांचं बोलणं ऐकलं जात नाही, भावना समजून घेतल्या जात नाहीत. फक्त चुका दाखवल्या जातात किंवा जबाबदाऱ्या आठववल्या जातात. अशावेळी माणूस आतून एकटा पडतो. आणि जेव्ह...