घटस्फोट" पश्चात्तापाची वेळ येऊ नये म्हणून…सुनिल जाधव पुणे, 9359850065
"घटस्फोट" पश्चात्तापाची वेळ येऊ नये म्हणून…सुनिल जाधव पुणे, 9359850065 घटस्फोटानंतर अनेक वर्षांनी दोन माणसं समोरासमोर येतात, तेव्हा त्यांच्या मध्ये शब्दांपेक्षा जास्त आठवणी उभ्या असतात. त्या आठवणी बोलत नाहीत, पण डोळ्यांतून सगळं सांगून जातात. अशीच एक भेट, एका साध्या लग्नसोहळ्यात, आयुष्याच्या वळणावर हरवलेल्या दोन माणसांची होती. तो तिला ओळखतो, पण ओळख न दाखवण्याचा प्रयत्न करतो. ती त्याच्याच समोर बसलेली असते, पण नजर चुकवते. वेळ पुढे गेलेली असते, आयुष्य पुढे गेलेलं असतं, पण मन मात्र तिथेच अडकलेलं असतं, जिथे दोघांनी एकत्र संसाराची स्वप्नं पाहिली होती. थोडा वेळ शांततेत जातो. आजूबाजूला हशा, गाणी, नातलगांचा गोंधळ असतो. पण यांच्या मध्ये एक वेगळीच शांतता असते. जड, बोचरी, न बोलता खूप काही सांगणारी. शेवटी कोणीतरी धीर करून बोलतं. प्रश्न साधाच असतो, “कशी आहेस?” पण त्या प्रश्नात अनेक वर्षांचं अंतर, दडलेला अभिमान आणि न व्यक्त झालेली हुरहूर असते. “ठीक आहे,” असं उत्तर येतं. ठीक म्हणजे नेमकं काय, हे दोघांनाही माहीत असतं. ठीक म्हणजे जुळवून घेणं, सहन करणं, दिवस ढकलणं. दुसरं लग्न, मुलं, संसार, या सग...