सेवानिवृत्ती: आयुष्याचा संध्याकाळ नव्हे, तर आत्मशोधाचा सुवर्णकाळ....!
सेवानिवृत्ती: आयुष्याचा संध्याकाळ नव्हे, तर आत्मशोधाचा सुवर्णकाळ....! लेखक: सुनिल पुणेTM 93598 50065 मानवी आयुष्याचा प्रवास हा ऋतूंसारखा असतो. बालपणाचा वसंत, तरुणपणाचा उन्मेष, प्रौढत्वाची जबाबदारी आणि शेवटी येणारा परिपक्वतेचा शांत, संयमी काळ. सेवानिवृत्ती म्हणजे या प्रवासाचा शेवट नसतो; उलट ती आयुष्याला नव्या दृष्टीने पाहण्याची, स्वतःला नव्याने शोधण्याची आणि जगण्याचा खरा अर्थ अनुभवण्याची एक सुंदर संधी असते. नोकरीच्या काळात माणूस आपल्या पदाशी, अधिकाराशी आणि ओळखीशी इतका एकरूप होऊन जातो की त्यालाच स्वतःचे अस्तित्व समजू लागते. अनेक वर्षे कार्यालय, व्यवसाय, जबाबदाऱ्या आणि धावपळ यांच्यात गेलेली असतात. पण एक दिवस असा येतो, जेव्हा त्या साऱ्या जबाबदाऱ्यांचा अध्याय संपतो आणि जीवन एका नव्या वळणावर येऊन उभे राहते. सेवानिवृत्तीनंतर सुरुवातीच्या काही वर्षांत माणसाला जाणवू लागते की ज्या संस्थेत, कार्यालयात किंवा क्षेत्रात त्याने आयुष्याची अनेक वर्षे घालवली, ते जग आता त्याच्याशिवायही सुरळीत चालत आहे. कालपर्यंत ज्याच्या निर्णयांना महत्त्व होते, त्याला आता एक सामान्य नागरिक म्हणून पाहिले जाते. ही वस...