Posts

Showing posts from June, 2025

स्त्रीचं मन आणि लेखकाचं स्थान

*स्त्रीचं मन आणि लेखकाचं स्थान* सुनिल पुणे™ 8007939422 स्त्रीचं मन म्हणजे एक अतीशय नाजूक आणि गूढ अशी कविता असते, जिला समजून घेणं प्रत्येकाच्या हातात नसतं. ती कोणालाही सहजपणे तिच्या अंतर्मनात प्रवेश देत नाही. ती हसते, बोलते, वावरते… पण तिच्या मनाच्या दाराशी उभं राहून खरं प्रेम कोण करतंय, हे ती खोलवर समजून घेते. आणि एकदा तिच्या मनाच्या मंदिरात जर तिने कोणाला स्थान दिलं, तर मग ती त्या व्यक्तीवर जीव ओवाळून टाकते. तिचं ते प्रेम असतं निस्सीम, नि:स्वार्थ आणि अबाधित. आणि जर त्या हृदयात स्थान मिळालं असेल एका लेखकाला, तर तो भाग्यवंत ठरतो. लेखकाचं कार्य केवळ शब्दांतून भावना मांडणं नसतं, तर तो स्त्रीच्या अव्यक्त भावना समजून त्यांना आपल्या लेखणीतून ओघवत्या पाण्यासारख्या सहजपणे मांडतो. जग जिथे तिला समजून घेण्यात कमी पडतं, तिथे हा लेखक तिच्या मनाच्या प्रत्येक वळणावरून चालतो. तिच्या डोळ्यांतले अश्रू ओळखतो, तिच्या हास्यामागचं दुःख शब्दबद्ध करतो. जेव्हा ती लेखकावर विश्वास ठेवते, तेव्हा तिला वाटतं की  "हा शब्दांचा जादूगार मला समजतो, माझ्या भावना ऐकतो, माझं मौनही वाचतो." तेव्हा ती त्या लेखकाच्या...

ती आई सकाळी उठते की, तिच्या उठण्यानेच सकाळ पल्लवित होते,

*ती आई सकाळी उठते की, तिच्या उठण्यानेच सकाळ पल्लवित होते,  ह्या वाक्यात केवढं मोठं सत्य लपलं आहे!* *आई* म्हणजे घराचा आत्मा, घरातली पहाट, घरातला सूर्यप्रकाश. आपण झोपेत असतो तेव्हा तिच्या पावलांचा आवाज नकळत कानावर पडतो,  तव्यावर चहा ठेवतानाचा आवाज, स्वयंपाकघरातल्या वाफाळत्या कुकरचा शिट्टी, कपाळाला लावलेलं कुंकू आणि गाभाऱ्यातल्या घंटीचा टिणटिणाट... हाच तर आपला पहिला अलार्म! *आईला* कुणी जागं करत नाही. ती स्वतः जागते, आणि तिच्यासोबत जागं होतं सगळं घर. तिच्या हातून चहा घेतल्यानंतरच दिवस खरंच सुरु झाल्यासारखा वाटतो. ती अंगण झाडते तेव्हा घराला जणू शुभ्र शांती लाभते. ती देवापाशी हात जोडते तेव्हा घरात एक भक्तिभाव दरवळतो. *आई* स्वतःसाठी काही मागत नाही, पण सगळ्यांचं काही ना काही तिच्या मनात असतं,  मुलाच्या परीक्षा, मुलीचं आजारपण, नवऱ्याचं जेवण, सासूचं औषध... आपण विसरतो, पण आई नाही विसरत. *आईसारखी* दुसरी कोणतीही सकाळ नसते. जिच्या हातून अन्न मिळतं, आशीर्वाद मिळतो, आणि ज्याचं प्रेम शब्दांत मावत नाही, ती म्हणजे आपली आई. आजवर विचार केला नव्हता,  *आई* सकाळी उठते की तिच्या उठण्यानेच सक...

प्रेमग्रंथ : विश्वासाचे मौन असले की प्रेम बोलके होते...

*प्रेमग्रंथ : विश्वासाचे मौन असले की प्रेम बोलके होते...*  सुनिल पुणे™  9359850065 sunilpunetm.blogspot.com प्रेम म्हणजे शब्दांनी व्यक्त होणारी गोष्ट नव्हे, प्रेम म्हणजे मौनातही ऐकू येणारा आवाज असतो. जिथं विश्वास असतो, तिथं नजरेतून संवाद घडतो, शब्दांची गरजच उरत नाही... मौनच पुरेसं असतं प्रेम उमजवायला. पण जिथं संशय असतो, तिथं शब्दही धारधार भासतात, 'म्हणून'च बऱ्याचशा प्रेमकथा शब्दांमध्येच संपुन जातात, आणि काही मौनाच्या समजुतीत अजूनही जपल्या जातात...खऱ्या प्रेमात ना हट्ट असतो, ना स्पष्टीकरणाची गरज, कारण दोघांच्या मनात असतो एक नाजूक विश्वासाचा धागा, जो न दिसता, न तुटता, नक्की जोडत राहतो. हा धागा एकदा मनातून जुळला, की मग नातं तक्रारींपेक्षा समजुतीचं होतं. प्रेम म्हणजे रोज ‘आय लव्ह यू’ म्हणणं नाही, तर रोज ‘तू आहेस माझ्यासोबत’ हा भाव जपणं असतं...कधी नजरानजर, कधी हसण्यामध्ये, तर कधी न बोलताही प्रेम उमजतं, फक्त विश्वास हवा…जर त्या दोघांमध्ये “मी तुझा आहे” आणि “तू माझी आहेस” हा विश्वास टिकून राहिला, तर नातं काळाच्या कसोटीवरही भक्कम ठरतं...कारण शेवटी प्रेम म्हणजे स्पर्श नव्हे, तर हृदयातल...

"सासू-सून आणि गाठोड्याची गाठ!"

*"सासू-सून आणि गाठोड्याची गाठ!"* लेखक सुनिल पुणे TM एक वेळ अशी असते की एखादी मुलगी लग्न होऊन घरात सून म्हणून येते… आणि हळूहळू तिचं लक्ष एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतं, सासूबाई म्हणजे बाईंचं मूळ रूप! सासूबाईंना वाटतं, "आपली सून म्हणजे जरा शांत, सुसंस्कृत, आपली काळजी घेणारी, स्वयंपाकात निपुण आणि मोठ्या माणसांची सेवा करणारी असावी…" पण सूनचं म्हणणं असतं, "हे घर म्हणजे माझं सुद्धा आहे, सासूबाई म्हणजे माझ्या आईसारख्या असाव्यात, माझ्या चुकांवर ओरडू नयेत, आणि WhatsApp वर ‘गुड मॉर्निंग’ तरी रिप्लाय द्यावा!" पण गंमत बघाच ज्या बाईने सासूबाईची खस्ता खाल्ली, तीच एक दिवस सासूबाई बनते आणि मग काय... "हिच्यासारखीच दुसरी एक आली का घरात!" असं तिनं स्वतःच्या सूनबाईविषयी सांगायला सुरुवात केली की पिढ्या पूर्ण वर्तुळात आल्यासारखं वाटतं. आणि हाच विनोदाचा क्लायमॅक्स! सासूबाईंचं म्हणणं: "आमच्या वेळी आम्ही नुसतं हसू लागलो तरी सासूबाई विचारायच्या, काही काम नाही का? आणि ही माझी सून तर माझ्यासमोरच मोबाईल वर reels बघते… आणि वर ती म्हणते ‘किती गोड आहे ना हे क्यूट कपल!’" स...

ती आणि तिचे इंद्रधनुष्याचे सात रंग"*

*"ती आणि तिचे इंद्रधनुष्याचे सात रंग"* लेखक: सुनिल पुणे TM 9359850065 आपल्या आयुष्यात काही व्यक्ती अशा येतात, ज्या फक्त आपले जीवन सुंदर करतातच असं नाही, तर त्या आपल्या अस्तित्वालाही एक नवीन रंग देऊन जातात. जणू काही त्या इंद्रधनुष्याचे रंग घेऊनच आपल्या आयुष्यात उतरतात... ती अशीच आली होती... नाही, ती चालत नव्हती आली, ती तर माझ्या मनाच्या पाऊलवाटांवर स्वप्नांचं इंद्रधनुष्य घेऊन उतरली होती. तिच्या हास्यातला पिवळसर उत्साह, तिच्या डोळ्यांतला निळसर स्वप्नाळूपणा, तिच्या स्पर्शातलं हिरवंचं आश्वासन आणि तिच्या शांततेत लपलेला जांभळा गूढपणा... ह्या सगळ्याने माझं संपूर्ण आयुष्य रंगून गेलं. तिच्याशी बोलताना, जणू शब्दांच्या पलिकडल्या गूढ रंगांमध्ये मी हरवून जायचो. ती काही मोठं काही बोलत नसे, पण तिच्या प्रत्येक साध्या वाक्यात एक भावनिक लालिमा असायचा तो जो माझ्या मनाला उब देत होता. कधी कधी वाटायचं, ही स्त्री एक व्यक्ती नसून, एका सुंदर ऋतूची साक्षात झलक आहे कारण जी एकाच वेळी शांतही आहे, आणि झपाटणारीही! आणि हो… तिच्यामुळे मला समजलं, की खरं प्रेम म्हणजे ‘तुला बदलण्याचा प्रयत्न’ नाही, तर ‘तुझ्यात ...

स्त्रीचं अंतर्मन समजून घेतले, तर आयुष्य सुंदर होतं, हेच वास्तव आहे !

*स्त्रीचं अंतर्मन समजून घेतले, तर आयुष्य सुंदर होतं, हेच वास्तव आहे !* लेखक – सुनिल पुणे TM 8007939422 आज जग विज्ञानाच्या शिखरावर पोहोचलंय, चंद्रावर माणूस गेला, डिजिटल जग सुध्दा बदललं... पण अजूनही एक गोष्ट समाज पूर्णपणे समजून घेतलेली नाही, ते म्हणजे "स्त्रीचं अंतर्मन". पुरुषप्रधान समाजात स्त्रीला नेहमी समजून न घेता "भावनिक", "कमकुवत", "चिकट", "तक्रार करणारी" अशा टॅग्समध्ये बंद केलं गेलं. पण खरंतर, स्त्रीचं मन हे महासागरासारखं विशाल, खोल आणि खूप नाजूक आहे. ते फक्त ऐकून समजत नाही, ते ‘मनापासून समजून घेतल्यावर’ उमगतं बरर, हे मला "सुनिल पुणे" ला समजले म्हणून हा लेख विचारपूर्वक लिहितोय कारण माझे पुरूष मित्र नाराज होतील आणि मला काय म्हणतील हे अभिप्रायातुन कळेलच  एक स्त्री खरोखर काय शोधते हो ! तर ती तुमच्याकडून पैसा, स्टेटस किंवा गाडी नाही मागत. ती केवळ दोन गोष्टी मागते, "समजूत" आणि "साथ". तिला वाटतं "कोणी आहे का जो माझं ऐकेल? जो मला दोष न लावता माझं दुःख समजून घेईल? जो माझ्या डोळ्यातील पाणी, दुख वाचेल, आणि म...

विधवा वा विधुराशी पुनर्विवाह एक संवेदनशील व वास्तववादी विचार*

*विधवा वा विधुराशी पुनर्विवाह  एक संवेदनशील व वास्तववादी विचार* सुनिल पुणेTM 8007939422 आजच्या बदलत्या सामाजिक रचनेत विवाहसंस्थेचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. नवविवाहित जोडप्यांमध्ये सामंजस्य, सहनशीलता आणि समजूतदारपणाचा अभाव दिसून येतो. भारतीय व ब्रिटिश कायदे विशेषतः महिलांच्या बाजूने झुकलेले असल्याने, अनेकदा विवाहामध्ये असमतोल निर्माण होतो आणि त्याचा शेवट फारकतीत होतो. मेंटेनन्स, कौटुंबिक वाद, आणि एकमेकांवरील अविश्वास यामुळे अनेक आयुष्ये उद्ध्वस्त होतात. परंतु, आयुष्यात एखादा विवाह मोडला आणि नव्याने आयुष्य सुरु करायचेच असेल, तर एक विचार करायला हवा  अशा वेळी आपण आपल्या सारख्याच वेदना अनुभवलेल्या एखाद्या विधवा किंवा विधुराशी गाठ बांधणे हे अधिक समंजस आणि संवेदनशील पाऊल ठरू शकते. विधवा वा विधुर व्यक्तींना आयुष्याचा खरा अर्थ, सहचराची किंमत, आणि नात्याचे महत्व अधिक चांगल्या प्रकारे समजलेले असते. त्यांच्या वेदनेतून त्यांनी सहनशीलता, प्रेम आणि आपुलकीचा अर्थ आत्मसात केलेला असतो. अशा जोडप्यांमध्ये परस्पर सन्मान, मूक समजूत आणि परिपक्वता असते. हे नातं केवळ दोन व्यक्तींचं नसतं, तर दोन आयुष...

आधुनिक युगात लग्नसंस्थेचं बदलतं स्वरूप

*आधुनिक युगात लग्नसंस्थेचं बदलतं स्वरूप – एक चिंतन,  सुनील पुणे TM 8007939422* आजचा काळ हा डिजिटल आणि मोबाईलच्या वेगवान युगाचा आहे. या काळात माणसांचे विचार, गरजा आणि आयुष्य जगण्याची पद्धत झपाट्याने बदलत आहे. याचा थेट परिणाम आपल्यासारख्या पारंपरिक भारतीय समाजातील "लग्नसंस्था" या मूलभूत घटकावर होत आहे. पूर्वी लग्न म्हणजे दोन कुटुंबांचा, दोन विचारधारांचा, दोन जीवनशैलींचा एकत्र येणं असायचं. संस्कार, संयम, सहवास, समर्पण आणि सहकार्य या आधारावर संसार उभा राहत असे. पण आज, ही परंपरा एका वेगळ्याच वळणावर उभी आहे. आजची तरुण पिढी  मुलं आणि मुली  आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत. शिक्षण, नोकरी, करिअरच्या संधीमुळे त्यांना स्वातंत्र्य मिळालंय. यामुळे लग्नाच्या बाबतीतही त्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. कुणी प्रेमविवाह करतंय, कुणी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतंय, तर कुणी लग्नच नको असं स्पष्टपणे सांगतंय. या बदललेल्या जीवनशैलीत ‘एकत्रित कुटुंबपद्धत’ ही संकल्पना हरवत चालली आहे. या पद्धतीत पती-पत्नीला मार्गदर्शन, आधार आणि जबाबदारी यांचा भक्कम पाठिंबा मिळत असे. आज ती साथ आणि समजू...

ऑनलाईन अत्यंविधी आणि डिजिटल चार खांदेकरी

* "ऑनलाईन अत्यंविधी आणि डिजिटल चार खांदेकरी – बदलती माणुसकीची रूपरेषा!" लेखक: Sunil Pune TM 8007939422* आज डिजिटल युगात आपण एकमेकांशी जोडले गेलो आहोत, पण प्रत्यक्ष भेटी मात्र दुर्मीळ झाल्या आहेत. जन्म, वाढदिवस, लग्न, अगदी आनंदाचे क्षणही आता फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि झूम कॉलवर साजरे होतात. एक काळ होता जेव्हा घरात कोणी आजारी असलं, तर नातेवाईक गावभरून भेटायला यायचे. आज मात्र त्याच्या तब्येतीचा अपडेट ‘स्टेटस’वर दिसतो, आणि ‘जलद बरे व्हा’ अशी कमेंट टाकून आपली जबाबदारी संपते. या वेगवान डिजिटल काळात एक विचार मनात येतो  कदाचित उद्या मृत्यूची बातमीही ऑनलाईनच येईल, आणि अत्यंविधीही झूमवर होईल! कोण जाणे, चार खांदेकरीही आपण डंजो, स्विगी किंवा पोर्टर अ‍ॅपवरून मागवू लागू! मोजक्या वेळात, वेळेवर येणारे आणि नंतर 'ऑर्डर कम्प्लिट' दाखवणारे. हे दृश्य हास्यविनोदी वाटू शकते, पण यामागे एक भीषण वास्तव दडलेलं आहे  माणुसकीच्या नात्यांची तुटलेली वीण. पूर्वी कोणाचं निधन झालं की संपूर्ण समाज दुःखात सहभागी व्हायचा. कुठल्याही जाती-धर्माचा विचार न करता सगळे एकत्र यायचे. शेवटचा निरोप देताना ...

ती"आणि सुनील, एक प्रेमकहाणी

*एक भावस्पर्शी कविता* *"ती"आणि सुनील,  एक प्रेमकहाणी. सुनिल पुणेTM 8007939422* "ती"चं हसणं होतं चंद्रप्रकाश, सुनीलचं मन त्यात हरवलेलं खास। पहिल्या नजरेत जुळलं काही, जणू दोन आत्म्यांची पूर्वीची पाहुणचं ओळख निघाली। "ती" फुलांवर रंगवायची स्वप्नांची दुनिया, तो कॅमेऱ्यात टिपायचा तिचं हास्य ओल्या क्षणांमधून। ती गाणं म्हणायची मनातल्या खोलून, तो ऐकत राहायचा शांततेतही तिचं गाणं पूर्ण। संध्याकाळी त्या झाडाखाली भेट, कधी चहा, कधी कविता, कधी फक्त नजरांची खेच। न सांगता शब्द, मनातलं सगळं कळायचं, सुनिलच्या नजरेत "ती" आपलीच वाटायची। प्रत्येक सणात, गोड आठवणींचा साज, प्रत्येक वादातही प्रेमाचा गंध, मृदु आवाज। हातात हात, स्वप्नं नव्या वाटांची, "ती" आणि सुनील  एक प्रेमगाथा अपूर्ण नसलेली, परिपूर्ण नातीची। ही कहाणी नाही फक्त पुस्तकातली, तर जिवंत आहे त्यांच्या डोळ्यांतल्या स्वप्नातली। काळ बदलला, दिवस सरले, पण भावना तीच राहिली, सुनिलच्या प्रेमात "ती" सदैव खुलून नाहली। तुझाच, सुनिल पुणे TM, 9359850065, sunilpunetm.blogspot.com  (फोटोग्राफी आणि प्रेम, दो...

शब्दांनी उधळलेलं प्रेम : एक अधुरी प्रेमकहाणी

*खरी लव मिस्ड स्टोरी वाचा व आनंद घ्या* *शब्दांनी उधळलेलं प्रेम : एक अधुरी प्रेमकहाणी लेखक सुनील पुणे TM 8007939422* प्रेमाला वयाचं बंधन नसतं… आणि ओळखीचंही. कधी कधी अगदी अनोळखी नाव, एखादा लेख, एखादा ग्रुप,  यांच्यामुळे सुरु झालेला संवाद नकळत हृदयाला भिडतो. माझ्या आयुष्यातही असंच काहीसं घडलं… आणि त्याच नाव होतं  "निशा" एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर माझ्या लेखामुळे तिचं लक्ष वेधलं गेलं. तिने मला तिच्या खास ग्रुपमध्ये सामील केलं. मी तिथे माझ्या विचारांनी लोकांपर्यंत पोहोचू लागलो. स्त्री-पुरुष दोघांकडून भरभरून अभिप्राय येऊ लागले. त्या सगळ्यांच्या शब्दांमध्ये एक गोड संवाद फुलू लागला… निशाशी. फक्त दोनच दिवस… पण मनात एक नातं जुळलं. सहज संवादाच्या ओघात मी काही बोललो, आणि तिने एकदम थेट "Shut up!" असं इंग्लिश वाक्य फेकून दिलं. क्षणात मी सावरलो आणि उत्तर दिलं  "Mind your language." त्यानंतर मी शांतपणे संवाद थांबवला. तिला फोनही बंद केला. पण काही गोष्टींची उत्तरं मौनात मिळतात. निशाने खूप वेळा क्षमा मागितली, भावनिक शब्दात मोठाले लेख लिहून पोस्ट केले  माझं नाव न घेता. ती झोपली ...

"वेळेचा सन्मान जीवनाचा खरा यशोमार्ग"*लेखक:

#everyone @everyone  *"वेळेचा सन्मान  जीवनाचा खरा यशोमार्ग"* लेखक: सुनिल पुणे TM 8007939422 मानव जीवन हे काळाच्या प्रवाहात वाहणारा एक अनोखा प्रवास आहे. या प्रवासात यश, अपयश, माणसं, नाती, समाज, संधी आणि संघर्ष यांचा सतत लपंडाव सुरू असतो. पण या सगळ्यांना एकत्र गुंफणारा आणि नियंत्रित करणारा अदृश्य सूत्रधार म्हणजे  वेळ. वेळ चांगली असेल, तर परका माणूसही आपल्यासाठी धावून येतो. लोक तुमचं बोलणं ऐकतात, तुमचं कौतुक करतात, तुम्हाला मान-सन्मान देतात. पण वेळ खराब झाली की, अगदी स्वतःची पत्नी, पती, मुलं, आई-वडील, भाऊ-बहीण आणि सख्खे नातेवाईकसुद्धा आपल्याला नाकारतात, परके समजू लागतात. त्यांच्या वागणुकीतले बदल जणू वेळेचंच प्रतिबिंब असतं. ही कटू पण सत्य गोष्ट आहे  वेळ चांगली असेल, तर सगळे आपले होतात, आणि वेळ वाईट आली की अगदी आपलेही परके होतात. ही वास्तवता कोणतंही शिक्षण शिकवत नाही, पण जीवन नजरेतून शिकवते. वेळ ही अशी गोष्ट आहे जी कोणासाठी थांबत नाही. ती प्रत्येकाला सारखीच मिळते  २४ तासांची. फरक एवढाच की कोणीतरी तिचा योग्य उपयोग करतो, तर कोणी ती वाया घालवतो. वेळेला समजून घेणं म्हणजे...

"क्षणभंगूर आयुष्य आहे आणि आनंदी जीवन हिच खरी संपत्ती"

*"क्षणभंगूर आयुष्य आहे आणि आनंदी जीवन हिच खरी संपत्ती"* सुनिल पुणे TM 8007939422 आयुष्य म्हणजे पाण्याचा एक बुडबुडा... कधी फुटेल, कधी विरून जाईल, याचा नेम नाही. आपण रोजच्या धावपळीत किती तरी गोष्टींचा विचार करतो, पुढील महिन्याचा EMI, पुढच्या वर्षीचं टूर प्लान, मुलाचं शिक्षण, पेन्शन योजनेची तरतूद... पण आयुष्य पुढच्या क्षणाची हमीच देत नाही. परवा घडलेली अहमदाबादजवळील एअर इंडिया विमान अपघाताची घटना आपल्या मनाला हादरवणारी होती. 241 प्रवासी... जे काही क्षणांपूर्वी विमानात हसत-खेळत बसले होते, आपापल्या स्वप्नांचं गाठोडं मनात घेऊन उड्डाण करत होते... पण काही क्षणांतच काळाच्या अधीन झाले. त्यांच्या योजना, त्यांच्या इच्छा, त्यांच्या चिंता, त्यांची मैत्री सगळं काही एका क्षणात सर्व संपलं! आपल्याकडे रोज रस्ते अपघात होतात, मोटारी उलटतात, रेल्वेमधून पडून जीव जातो... आणि काही वेळा वाटतं, आपणही तेव्हाच होतो ना त्याच ठिकाणी... मग आपण का वाचलो? आणि ज्या गेले, त्यांचं काय चुकलं होतं? हे सगळं पाहता, एकच गोष्ट लक्षात येते, आयुष्य कोणालाही हमीपत्र देत नाही. मग का आपण रोज कुणाला दुखवत जगायचं? का खोट्या प...

"नियत साफ असेल ना, तर जग कितीही घाण पसरवो… आपण स्वच्छ राहतो!”

*“नियत साफ असेल ना, तर जग कितीही घाण पसरवो… आपण स्वच्छ राहतो!”* ✍️ सुनिल पुणे™ 9359850065 लोक बोलतील… लोक खोटं पसरवतील… लोक तुमचं नाव बदनाम करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. पण… आपण आपल्या आरशात पाहताना लाजलो नाही ना… तर बाकी जगाची नजर आपल्याला कधीच झुकवू शकत नाही! मन आणि नियत,  ही दोन गोष्टी कोणाच्या खिशात विकत मिळत नाहीत. हे असतं, जन्मजात मिळालेलं, आई-बापानं दिलेलं, आणि वेळेनं घडवलेलं. जे लोक नियत घाण ठेवतात, ते इतरांना घाणीत खेचायचा प्रयत्न करतात — पण जे पाय जमिनीवर ठेवून चालतात, त्यांना कोणीही ढासळवू शकत नाही. मी कुणाचं वाईट केलं नाही… मी कुणावर डाव खेळला नाही… मी फक्त माझं काम प्रामाणिकपणे केलं… हे जेव्हा स्वतःला सांगता येतं, तेव्हा जगाचा प्रत्येक आरोप निष्प्रभ वाटतो. कारण जग बोलत राहतं, आणि नियती शांतपणे आपलं काम करत राहते. आज नाही… उद्या नाही… पण नियतीचं न्यायालय कधीही खोट्याच्या बाजूने निर्णय देत नाही. ज्यांचं अंतरमन निर्मळ असतं, त्यांना जगात कुठलीही लक्तरं उघडं पाडू शकत नाहीत. कारण तेच लोक दिवसाचा उजेड नकोसा झाला तरी रात्री चांदण्यात झोपतात,  आपल्याच ‘साफ नियत’ या उबदार...

"स्त्रीचा हरवलेला 'मी' , जो तिने कधी शोधलाच नाही!"

"स्त्रीचा हरवलेला 'मी'  , जो तिने कधी शोधलाच नाही!" (लेखक: सुनिल पुणे TM 8007939422) तिचं नाव, तिचं रूप, तिचं घर, तिची जबाबदारी, तिचं कुटुंब, तिचा व्यवसाय, तिचं शिक्षण,  सगळं काही "तिचं" असतं, पण तिला स्वतःचं 'मी' कधीच सापडलेलं नसतं. आणि गंमत म्हणजे, तिने तो शोधण्याचा प्रयत्नसुद्धा कधी केला नाही... कारण समाजाने तिला कधी ही परवानगीच दिली नाही, आणि तिने ती परवानगी मागितलीसुद्धा नाही. स्त्रीचा स्वतःच्या 'मी' कडे प्रवास ती शाळेत असते तेव्हा "चांगली मुलगी" व्हायचं दडपण असतं. कॉलेजमध्ये गेल्यावर "सावध रहा" चा सल्ला. लग्न झाल्यावर "संस्कारांची जाण असलेली सून" बनायचं बंधन. ऑफिसमध्ये "संवेदनशील सहकारी", आणि घरी "कर्तव्यदक्ष आई किंवा पत्नी". या साऱ्या जबाबदाऱ्या पेलताना ती एक गोष्ट कायम विसरते,  स्वतःचा आत्मा, स्वतःची ओळख, तिचा 'मी'! आजही ती स्वतःच्या मनात विचार करत नाही... तुम्ही काहीही म्हणा, स्त्रीने स्वतःलाच कधी विचारले आहे का ? “मला खरंच काय आवडतं ?” “माझं एक स्वतंत्र मत आहे का ?...

पहिलं प्रेम चुकीच्या व्यक्तीशी तर दुसरं प्रेम चुकीच्या वेळेला होते...

*पहिलं प्रेम चुकीच्या व्यक्तीशी तर दुसरं प्रेम चुकीच्या वेळेला होते...* ✍🏻 सुनिल पुणे™ 8007939422 प्रेम... हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतोच. पण गंमत अशी की, पहिलं प्रेम नेहमीच त्या व्यक्तीवर होतं जो आपल्यासाठी योग्य नसतो. ती भावना एवढी उत्कट असते की आपण समजून न घेता फक्त मनाच्या ओढीने त्याच्या मागे जातो. त्यावेळी वय तरुण असतं, अपेक्षा मोठ्या असतात आणि अनुभव शून्य. त्यामुळे पहिल्या प्रेमात आपण स्वतःला हरवून टाकतो... आणि शेवटी जेव्हा वास्तव समोर येतं, तेव्हा दुःख, वेदना, आणि आतून तुटल्याचा अनुभव येतो. मग आपण स्वतःला सावरतो... वेळ निघून गेलेली असते. आणि अचानक आयुष्यात एक व्यक्ती येते... जी खरंच आपल्यासाठी योग्य असते. तिच्या प्रत्येक बोलण्यात आपलेच प्रतिबिंब दिसते, तिच्या प्रत्येक स्पर्शात आपलेच मोल जाणवते. पण दुर्दैव असं की हे प्रेम योग्य व्यक्तीशी होतं, पण चुकीच्या वेळेला. कधी ती व्यक्ती आधीच कोणाच्या तरी जोडीदार असते, कधी समाज, परिस्थिती, जबाबदाऱ्या यामधून ते प्रेम व्यक्त करता येत नाही. आणि मग मनात एक शांत खंत राहते, "जर तीच व्यक्ती आधी भेटली असती तर......

नकळत माझे मन तुझ्या प्रेमात पडल

*"नकळत माझे मन तुझ्या प्रेमात पडल…"* ✍️ लेख: सुनिल पुणे TM 8007939422 नकळतच सोशल मिडियावर सुरुवात झाली… ओळख साधी, विडीयी व फोटो नजरभेट छान आणि संवाद अगदी साधेपणाचा… पण या सगळ्या साधेपणामागे एक गोड ओढ दडलेली होती… तुझ्या बोलण्यातला मृदुता, हास्याच्या रेषेतला विश्वास, आणि नजरेतला न बोललेला जिव्हाळा कधी मनाच्या कोपऱ्यात घर करून गेला, ते कळलंच नाही… प्रत्येक दिवसात तुझी आठवण एक नवीन अर्थ घेऊन येते. तुझ्या नावाशिवाय मन शांत राहत नाही… तू जवळ नसलीस तरी तुझी चाहूल मनात सतत असते. हृदय हे नकळतच तुझं नाव घेतं… आणि प्रत्येक धडधडीत तुझीच आठवण घोळते… प्रेमाची कबुली कुठेच दिली नाही मी, तरीसुद्धा माझं प्रत्येक वागणं तुझ्यावरचं प्रेम बोलून जातं. तू समोर आलीस की शब्द सैरावैरा होतात, पण डोळे मात्र सारे काही सांगून जातात… तुझ्या प्रत्येक "कस आहेस?" मध्ये एक काळजी लपलेली असते, तुझ्या हसण्यात एक आश्वासन असतं, "मी आहे तुझ्यासोबत… कायमच…" आणि त्या क्षणी वाटतं , हो… नकळतच, पण पूर्ण मनानं, मी तुझ्या प्रेमात पडलो आहे… हे प्रेम मोठं साधं आहे… हक्क न करता समजून घेणं… मिळाल्यास आनंद, ...

"जिवंतपणी" माणूस ओळखावा...!

*"जिवंतपणी माणूस ओळखावा..."* ✍️ Sunil Pune TM 8007939422. "हा माणूस फार चांगला होता..." हे वाक्य आपल्याला नेहमी कुठे ऐकायला मिळतं? अगदी खरं सांगायचं झालं, तर कुणाच्या मृत्यूनंतरच! म्हणजे एखादा जिवंत असेपर्यंत तो 'कोण आहे', 'कसा आहे', 'कसा वागतो', यावर टीका, तक्रारी, दुर्लक्ष, शंका, सगळं काही होतं... पण तो गेल्यानंतर मात्र अचानक सगळं बदलतं. तेव्हाच त्याचं नाव घेतलं जात नाही... "बॉडी कुठे ठेवायची?", "बॉडी उचला", "बॉडी आलंय का?" म्हणजे तो माणूस होता, त्याचं नाव होतं, आयुष्य होतं, भावना होत्या, हे सगळं काही क्षणातच 'बॉडी'मध्ये परिवर्तित होतं. ज्याच्याबद्दल आयुष्यभर आपल्याला बोलायचं होतं, त्याच्याबद्दल आपल्याला प्रेमाने, आदराने वागायचं होतं, तो माणूस जेव्हा हयातीत असतो, तेव्हा त्याची किंमत आपल्याला कधीच कळत नाही. अन् जेव्हा तो निघून जातो, तेव्हा उरतात आठवणी, पश्चात्ताप आणि नकोसं शून्य... हीच तर खरी शोकांतिका आहे आपल्या समाजाची. माणूस हयातीत असताना त्याला नजरेत स्थान द्यायला आपण कचरत असतो. पण गेल्यावर मात्र त्य...

प्रेमापेक्षा जास्त… एक सच्चा मित्र/मैत्रीण!

*"प्रेमापेक्षा जास्त… एक सच्चा मित्र/मैत्रीण!"* ✍️  सुनिल पुणे TM 8007939422 *आपल्या जीवनात प्रेमाचं स्थान मोठं असतं.* प्रेमात भावना असतात, आकर्षण असतं, ओढ असते… पण या साऱ्या गोष्टींपेक्षा वरचढ एक नातं असतं,  मैत्रीचं! मैत्री म्हणजे फुलासारखी नाजूक आणि पर्वतासारखी मजबूत. मैत्री म्हणजे प्रेमापेक्षाही खोल, नि:स्वार्थ आणि स्थिर. प्रेमात कधी अपेक्षा असतात, पण सच्च्या मैत्रीत असतो तो फक्त स्वीकार! आपण जे आहोत, तसेच आपल्याला कोणीतरी संपूर्णपणे स्वीकारतो… त्या मैत्रीत! कधी आपण तुटतो, हरवतो, अडखळतो… तेव्हा प्रेम कधीकधी दूर जातं, पण सच्चा मित्र/मैत्रीण मात्र आपल्या डोळ्यातल्या अश्रूंमध्ये स्वतःला भिजवतो! प्रेम विसरलं जातं, पण सच्ची मैत्री हृदयात कायमची कोरली जाते. असा मित्र किंवा मैत्रीण ज्याच्यासोबत आपण न बोलताही संवाद साधू शकतो, ज्याच्यापुढे आपली लाज, भीती, अहंकार… सारं काही फेकून देतो, जो/जी आपल्यासाठी वेळ काढतो, न बोलता आपले दुःख समजतो… तो/ती प्रेमापेक्षाही मोठा असतो/असते. खऱ्या मैत्रीचं सौंदर्य असतं की, त्यात वासनेचा गंध नसतो, पण भावनेचा सुगंध असतो. हे नातं आपल्या आत्म्याला स्पर्...

पत्नी असूनही नसल्यासारखीच… एका पतीचे मौन मनोगत

पत्नी असूनही नसल्यासारखीच…   एका पतीचे मौन मनोगत ✍️ Sunil Pune TM ती घरात असते… पण संवाद हरवलेला असतो. ती बोलते, पण शब्दात आपुलकीचा ओलावा नसतो. तिचं अस्तित्व आहे, पण साथ नाही, समजूत नाही, सोबत तर दूरची गोष्ट. एकेकाळी तिच्या हास्याने घर उजळून निघायचं. आज तेच घर दडपणात गुदमरतं. तिच्या डोळ्यांत असणाऱ्या स्वप्नांची जागा आता शंका आणि उपेक्षेने घेतली आहे. पत्नी आहे, पण पती म्हणून माझं अस्तित्व तिच्या दृष्टीनं निरर्थक झालं आहे. कधी कधी वाटतं, ही सहजीवनाची नाती इतकी कोरडी, इतकी एकांगी का झाली? मी दोषी असेनही काही ठिकाणी… पण संवादाने मार्ग निघाला असता. समजुतीने नातं वाचलं असतं. पण ती दूर जात गेली, आणि मी थांबलो एकटाच. आजची सगळी कायदेशीर व्यवस्था,  अगदी कायदाही,  एकतर्फीपणे तिच्या बाजूने झुकलेला वाटतो. माझे मनोधैर्य, माझ्या भावना, माझं दुःख... कुणाच्या खिजगणतीत नाहीत. तिने “नाही” म्हटल्यावर माझं “हो” ही दुय्यम ठरतं. मी पती असलो तरी, माझ्या इच्छांना, स्वाभिमानाला, वेदनांना मूल्य उरलेलं नाही. फारकत म्हणजे सुटका असावी असं वाटतं, पण ती सुद्धा वेळखाऊ, त्रासदायक आणि सामाजिकद...

एकांताच्या सावल्यांतून उमलणारी ती.

*"एकांताच्या सावल्यांतून उमलणारी ती..."* (लेखक – सुनिल पुणे TM 8007939422) *ती… जी आज एकटी राहते असेल किंवा समाजात "विधवा" या नावाने ओळखली जात असेल.*  पण एकेकाळी संसाराच्या रंगमंचावर तिची भूमिका सौभाग्यवती म्हणून तेजस्वी होती. पण नियतीने तिच्या हातात संधी नाही, तर सावली दिली. पती हरपल्यानंतर समाजाने तिला हळूहळू एकटं केलं… आणि मग सुरू झाली तिच्या मनाची एक अदृश्य गाथा… ती गाथा कुठे लिहून ठेवलेली नसते. पण ती तिच्या नजरेत असते, तिच्या शांततेत असते, तिच्या साडीच्या पदरात दडलेली असते. दिवस भर शेजाऱ्यांसोबत हसणारी, देवळात देवासमोर हात जोडणारी, बाजारात फळं घेताना सौदा करणारी,  ही तीच असते. पण रात्रीची शांतता आली की, तिच्या मनातल्या आठवणींचा कल्लोळ सुरु होतो. ती झोपताना उशीत डोळे नाही, तर अश्रू दडवते. पण तरीही... ती मोडत नाही. ती उभी राहते. तिच्यात एक वेगळी ताकद असते,  जिचं नाव असतं "अनुभव." समाज तिच्याकडे कधी दयेने बघतो, कधी संशयाने. कुणाला वाटतं, "एकटी स्त्री म्हणजे लगेच तिच्या मागे लागा." कुणी म्हणतं, "आता हिला संसाराची गरज नाही." पण कुणी विच...

हक्काचा मित्र/मैत्रीण"

*"हक्काचा मित्र/मैत्रीण"* सुनिल पुणे TM 8007939422 आयुष्य हे रोज नव्या प्रश्नांनी भरलेलं असतं. कधी मनासारखं घडतं, तर कधी अगदी विरुद्ध. सुख-दुःखाचं चक्र अखंड फिरत राहतं. पण या साऱ्या गडबडीत, या धावपळीत, जेव्हा कुणीतरी आपल्याला "तुझ्या चेहऱ्यावर काही तरी वेगळं दिसतंय, काय झालंय सांग ना..." असं हळू आवाजात विचारतं,  तेव्हा तो क्षण म्हणजे खरं सुख असतं! जगात कितीही लोक असले, सोशल मीडियावर हजारो फ्रेंड्स असले, तरी एक हक्काचा माणूस हवा,  जो आपल्याला समजून घेईल, आपल्या चेहऱ्यावरचं खोटं हसू ओळखेल, आणि शब्दांपलीकडचं दुःखही समजेल. असा माणूस मिळणं हीच आजच्या काळात संपत्ती आहे. कधी कधी आपण खूप थकलोले असतो, मनात वादळं असतात पण ओठांवर हसू असतं. अशा वेळी एखादा मित्र किंवा मैत्रीण जेव्हा थांबून फक्त विचारतो, "सांग ना, काय झालंय?"  तेव्हा वाटतं, अजूनही माणुसकी जिवंत आहे. हा हक्काचा माणूस तुमचा बालपणीचा मित्र असू शकतो, कॉलेजमधला ग्रुपमधला कोणी असू शकतो, ऑफिसमधला सहकारी, किंवा अगदी घरातील बहीण-भाऊ. पण हा माणूस असा असतो, की त्याच्याशी बोलल्यानंतर ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं. तो ...

ती... एक चालतीफिरती कविता!

"ती... एक चालतीफिरती कविता!" सुनिल पुणे TM 8007939422 ती जन्माला आली, तेव्हा कोणीतरी घरात कुजबुजलं… “पुन्हा मुलगीच का झाली?” ती हसली नव्हती, पण तिचं अस्तित्व गालबोट ठरलं… तरीही तिने श्वास घेतला, कारण नियतीला माहीत होतं की एक दिवस हीच मुलगी इतिहास लिहिणार आहे. ती बालपणी खेळली, तिच्या बाहुल्यांना लग्नं लावली, पण तिला स्वतःचं लग्न लावायला जगानं पायजम्या घातल्या. तिच्या डोळ्यांमध्ये स्वप्नं होती, पण जगानं तिला “कर्तव्य” नावाचं बिंधास्त ओझं दिलं. तिने आई होण्याच्या वेदना सहन केल्या, पण स्वतःच्या वेदना कुणाला जाणवू दिल्या नाहीत. ती कुठेही असो,  शेतात असो, ऑफिसात, स्वयंपाकघरात, प्रयोगशाळेत, अथवा रणांगणात,  ती नेहमीच दुसऱ्यांसाठी लढत राहिली. कधी तिने चुलीवर भाकरी थापली, तर कधी कल्पनांच्या विस्तवावर विज्ञान शिजवलं. कधी तिने पायात बांगड्या वाजवल्या, तर कधी काळजाच्या तारा छेडून शांतता पेरली. तिला कोणी “कमकुवत” म्हटलं, पण तिने वेळ आल्यावर अख्खं कुटुंब पाठीवर उचललं. तिला कोणी "भावनाशील" म्हटलं, पण संकटात तीच बिनधास्त उभी राहिली. तिला कोणी “मुलगी” म्हणून मर्यादा दाखवल्या, पण तिने...

चांगली माणसं सोबत असली की, वाईट दिवस पण छान वाटू लागतात…

*चांगली माणसं सोबत असली की, वाईट दिवस पण छान वाटू लागतात…* ✍️ Sunil Pune TM 8007939422. *आयुष्य म्हणजे एक प्रवास…* सुखदु:खाच्या, चढ-उतारांच्या आणि अनपेक्षित वळणांच्या रस्त्याने चालत जाणारा हा प्रवास कधी सरळसोट असतो, तर कधी कठीण वाटणारा. पण या प्रवासात एक गोष्ट आपल्याला आधार देते, सावरण्याची ताकद देते,  ती म्हणजे "चांगली माणसं". वाईट दिवस हे कोणाच्याही आयुष्यात येतात. एखादी अडचण, अपयश, मानसिक खच्चीकरण, किंवा आपल्याच जवळच्यांची साथ सोडून जाणं… या काळात मन अगदी गोंधळून जातं. जगणं निरस वाटू लागतं, हसणं विसरून जातो आपण. पण अशा वेळी जर आपल्या भोवती काही चांगली, समजूतदार, दिलखुलास आणि प्रेमळ माणसं असतील, तर ते वाईट दिवसही काहीसं हलकं वाटू लागतात. चांगली माणसं म्हणजे काय? हे ते लोक असतात जे तुमच्यावर संकट आलं की पाठीवर हात ठेवतात, जे तुमच्या मनातली निराशा न वाजवता ऐकून घेतात, जे नुसत्या उपस्थितीने तुमच्या दुखण्यावर फुंकर घालतात. ते तुमचं दु:ख संपवत नाहीत, पण त्यावरचं ओझं थोडं हलकं करतात. या चांगल्या माणसांचं काहीवेळा बोलणं लागतं, कधी त्यांच्या डोळ्यातलं प्रेम दिसतं, तर कधी त्यांच्या ...

गृहिणी ही घराची सीईओ

"गृहिणी ही घराची सीईओ !" लेखक: Sunil Pune TM 8007939422 *आपण आज कितीही प्रगत झालो असलो, जगभरातून काम करत असलो,* तरी आपल्या प्रत्येक यशामागे एक न दिसणारा आधार असतो,  ती म्हणजे गृहिणी. घराचं व्यवस्थापन, मुलांचं संगोपन, वृद्धांची सेवा, नवऱ्याचा पाठिंबा आणि प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचं नियोजन,  हे सगळं ती कोणत्याही पगाराशिवाय न थकता, न कंटाळता करते. हे केवळ काम नाही, ही एक पूर्णवेळ जबाबदारी आहे. नोकरी करणाऱ्या महिलांना वेतन मिळतो, टायटल मिळतो, वर्धापन दिन साजरा केला जातो. पण घर चालवणाऱ्या बायकांना केवळ कर्तव्य समजून आपण त्यांचा आदर करतो. खरं तर तिचंही योगदान घरापुरतं मर्यादित नाही,  ती एक संपूर्ण व्यवस्थापन यंत्रणा आहे. गृहिणीचं कॉर्पोरेट पद *C.H.O. – Chief Home Officer* या पदानुसार ती घरातील: *HR Manager* घरातील सर्व सदस्यांचं मन आणि भावना समजून घेते. *Finance Officer* घरखर्चाचं काटेकोर बजेट बनवते. *Logistics Head* स्वयंपाक, खरेदी, मुलांच्या शाळेची व्यवस्था करते. *Event Planner* सण-समारंभ, वाढदिवस, पाहुणचार सगळं नियोजनबद्ध करते. *Healthcare Manager* सगळ्यांच्या तब्येतीकडे ल...

पुरुषाला या दोन गोष्टी स्त्रीने न मागता दिल्या, तर तो स्त्रीला कधीच धोका देत नाही..!

*पुरुषाला या दोन गोष्टी स्त्रीने न मागता दिल्या, तर तो स्त्रीला कधीच धोका देत नाही..!* पुरुष हा भावनिकदृष्ट्या बाहेरून कठोर भासणारा असतो, पण त्याच्या अंतर्मनात प्रेम, समर्पण, आणि आपुलकीची खोल भावना असते. बहुतेकवेळा तो स्वतःच्या भावना व्यक्त करत नाही, पण त्यालाही काळजी, प्रेम आणि समजूतदारपणाची गरज असते. जर एक स्त्री पुरुषाला दोन विशिष्ट गोष्टी न मागता दिल्या, तर तो तिचा आयुष्यभर आदर ठेवतो, तिच्यावर प्रामाणिक राहतो आणि तिला कधीच धोका देत नाही. 1. स्वतःवर असलेला विश्वास आणि प्रोत्साहन प्रत्येक पुरुषाच्या जीवनात काही स्वप्नं, काही अपयशं, काही असुरक्षा असतात. अशा वेळी त्याला समजून घेणारी आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती हवी असते. जर स्त्री त्याच्या क्षमतांवर न मागता विश्वास ठेवते, त्याच्या स्वप्नांना प्रोत्साहन देते, त्याला समजून घेते,  तर तो त्या स्त्रीच्या प्रेमात खोलवर गुंततो. तो अनुभवतो की, "ही स्त्री माझ्या यशातच नव्हे तर माझ्या अपयशातही माझ्या सोबत उभी आहे." आणि अशा नात्याला तो कधीच धोका देत नाही. 2. मान आणि प्रेमाने भरलेली साथ पुरुष खूपदा जबाबदाऱ्यांनी थकलेला असतो. त्...

स्त्रीला या दोन गोष्टी पुरुषाने न मागता दिल्या तर ती पुरुषाला कधीच धोका देत नाही.

*स्त्रीला या दोन गोष्टी पुरुषाने न मागता दिल्या तर ती पुरुषाला कधीच धोका देत नाही..!* सुनिल पुणे TM 8007939422  स्त्री,  एक प्रेमळ, समर्पित, आणि भावनाशील व्यक्तिमत्त्व. ती घराचा आत्मा असते. स्त्रीचे मन जिंकण्यासाठी महागड्या वस्तूंची, गिफ्ट्सची, मोठ्या अपेक्षांची गरज नसते. खरंतर स्त्रीला जिंकायचं असेल, तर फक्त दोन गोष्टी न मागता दिल्या, की ती आयुष्यभर आपल्या पुरुषाची साथ सोडत नाही. 1. आदर आणि विश्वास सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आदर आणि विश्वास. स्त्रीचं मन फार नाजूक असतं. ती प्रेमासोबतच सन्मान आणि विश्वासाची भुकेली असते. जर एखादा पुरुष तिला न मागता तिच्या विचारांना, निर्णयांना, अस्तित्वाला मान देतो, तिच्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो,  तर ती कोणत्याही परिस्थितीत त्याचा हात सोडत नाही. तिला वाटतं की हा माणूस माझं खरं स्थान ओळखतो आणि मला माझ्या अस्तित्वासकट स्वीकारतो. जेव्हा विश्वास असतो, तेव्हा कोणतंही नातं डगमगत नाही. 2. वेळ आणि लक्ष दुसरी गोष्ट म्हणजे वेळ आणि लक्ष. अनेक पुरुष हे गृहीत धरतात की घर सांभाळणं, मुलांना वाढवणं, स्वयंपाक करणं ही स्त्रीची जबाबदारी आ...

स्त्रीचं अंतर्मन : बायको आणि प्रेयसी यांचं न बोललेलं, पण खरं मन

*स्त्रीचं अंतर्मन : बायको आणि प्रेयसी यांचं न बोललेलं, पण खरं मन* लेखक सुनिल पुणे TM मी बायको आहे… पण त्याचबरोबर मी एक स्त्रीही आहे… कधी साडीच्या घडीत गुंतलेली, कधी बांगड्यांच्या आवाजात हरवलेली, कधी फुलांच्या माळांमध्ये ओळख विसरलेली, तर कधी स्वयंपाकघरात स्वतःच्या स्वप्नांना मंद आच दिलेली... मी प्रेयसी होते… कधी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवणारी, कधी त्याच्या एका फोनसाठी अख्खं दुपार वाट पाहणारी, कधी डोळ्यांत काळजी, ओठांवर हास्य आणि मनात स्वप्न घेऊन झोपी जाणारी. बायको झाल्यावर प्रेम संपत नाही… फक्त त्याचं रूप बदलतं… कधी टिफिनमध्ये प्रेमाचं पोषण भरून पाठवतं, कधी ताप आलेल्या नवऱ्याच्या कपाळावर थंड फडके ठेवतं, कधी 'उगाच उशीर होतोय' म्हणून मनात हजार शंका घेऊनही काही न बोलता वाट पाहत बसतं. मी आजही त्याची प्रेयसी आहे… पण मी आता त्याचं घरही आहे, त्याची जबाबदारीही. त्याच्या आईवडिलांची सून, त्याच्या मुलांची आई, आणि तरीही त्याच्या आयुष्यातील पहिलीच आणि शेवटची 'ती' राहायचं स्वप्न पाहणारी. कधी रागावते, कधी अबोला धरते, पण मनात कुठेतरी अजूनही त्याच्या हातात हात गुंफून मोकळ्या आकाशात चाला...