Posts

Showing posts from August, 2025

समर्थ रामदास स्वामी व गणपतीची आरती

*समर्थ रामदास स्वामी व गणपतीची आरती* सुनिल पुणे TM 8007939423 समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्रातील थोर संत, समाजसुधारक व भक्ती-मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या वाङ्मयातून भक्ती, निष्ठा आणि राष्ट्रप्रेम यांचा दिव्य संदेश दिला. त्यांच्या ग्रंथांमध्ये दासबोध, मनाचे श्लोक, विविध स्तोत्रे, अभंग व आरत्या प्रसिद्ध आहेत. गणपतीबाबत त्यांनी रचलेली सर्वात प्रसिद्ध आरती म्हणजे,  *"सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची"* ही आरती आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि बाहेरही गणेशोत्सवात, मंदिरात आणि घराघरांत रोज भक्तिभावाने गायली जाते. मोरेश्वर मंदिर हे पुणे जिल्ह्यातील मोरेगाव (अष्टविनायक पैकी पहिले स्थान) येथे आहे. परंपरेनुसार, समर्थ रामदास स्वामी जेव्हा महाराष्ट्रभर फिरत होते, तेव्हा त्यांनी मोरेश्वर मंदिराला भेट दिली होती. त्या वेळी गणपतीच्या महतीचे स्मरण करून त्यांनी "सुखकर्ता दुःखहर्ता" ही आरती येथेच रचली होती, यामध्ये गणपतीला "सुखकर्ता" म्हणजे सुख, आनंद देणारा आणि "दुःखहर्ता" म्हणजे संकट व दुःख दूर करणारा देव म्हणून गौरविले आहे. आरतीत विघ्नहर्ता, मंग...

"एक स्त्री" तिच्यावर होणारा रोजचा नजरेतील बलात्कार

"एक स्त्री" तिच्यावर होणारा रोजचा नजरेतील  बलात्कार लेखक  सुनिल पुणे TM 8007939422 "मी एक स्त्री आहे... माझं स्वतःचं मन आहे, विचार आहेत, स्वप्नं आहेत. पण हे सगळं जगाला दिसतच नाही. रस्त्यावर पाऊल टाकताच मला आधी जाणवतात त्या नजरा… ज्या माझ्या डोळ्यांना भिडत नाहीत, पण माझ्या शरीरावरून घसरत राहतात. हो, रोजचा बलात्कार मी सहन करते,  शब्दांनी नाही, हातांनी नाही, पण नजरेने. एखादी टवाळटवाळ टिप्पणी, एखादा शिट्टीचा आवाज, किंवा एखादी घाणेरडी नजर मला आतून कितीदा मारते हे कुणालाच कळत नाही. मी घराबाहेर निघताना माझ्या वेशभूषेबद्दल, चालण्याबद्दल, बोलण्याबद्दल विचार करते. का? कारण मला माझ्या सुरक्षेबद्दल काळजी असते. पण खरं तर मला नाही बदलायचं, बदलायला हवेत त्या नजरांना, त्या विचारांना. शारीरिक अत्याचार एकदाच होतो आणि त्याच्या जखमा दिसतात. पण नजरेचा बलात्कार रोज होतो, शेकडो वेळा होतो आणि त्या जखमा कुणालाच दिसत नाहीत,  कारण त्या आत खोलवर उमटतात...मला हवं आहे तेवढंच माझ्या अस्तित्वाकडे बघा, माझ्या क्षमतेकडे बघा, माझ्या विचारांकडे बघा. मी केवळ शरीर नाही. मी आई आहे, बहीण आहे, मुलगी आहे, पत...

सोशल मीडियावरील नाती किती खरीखुरी पुणेरी आवृत्ती..!

सोशल मीडियावरील नाती किती खरीखुरी पुणेरी आवृत्ती..! सुनिल पुणेTM 8007939422 आजकाल सोशल मीडियावर लगेच स्त्री पुरूष ओळख वा प्रेम जुळतं ? म्हणजे! पण खरं सांगू का? हे “प्रेम” म्हणजे काय तर  “हाय, हेलो, गुड मॉर्निंग” पासून सुरू होतं, आणि दोन दिवसात मग थेट  “जरा पैसे पाठव ना, अडचण आहे” इथपर्यंत पोचतं. आणि नाही पाठवलं तर नातं संपलं. एवढंच ते ओळख प्रेम. आणि जर पुरुषाने फक्त शरीरसुखासाठी स्त्रीबरोबर नातं केलं, तर तो “खलनायक” ठरतो. पण बाईने जर फक्त पैशासाठी नातं केलं, तर ती “त्यागमूर्ती” ? पण तस नाही हो! दोन्ही सारखेच चुकीचे आहे. मैत्री वा प्रेम म्हटलं की त्यात आदर आणि विश्वास हवाच. बाकीचा “स्वार्थ” म्हणजे थेट कचऱ्याच्या बादलीत टाकायच्या वस्तू सारखेच होईल. पण पुण्यात आम्ही थोडक्यात सांगतो की..  “खर्‍या प्रेमात शरीराचं आकर्षण चालतं, पैशाचं लोभ लगेच चालत नाही.”  “गोड बोलणाऱ्यांपासून जपून रहा, कारण गोड बोलणं म्हणजे सर्वच बिलकुल फुकटात मिळेल अस नाही.” आजच्या सोशल मीडियावरची ९०% नाती ही “फुकटात सुख, लगेच उधारीत खर्च” या धर्तीवर चालतात. आणि मग पुढे काय होतं? बातमी व चर्चा  ...

जीव लावलेला असतो म्हणून तर त्रास होतो…

जीव लावलेला असतो म्हणून तर त्रास होतो…सुनिल पुणेTM 8007939422 माणसाच्या आयुष्यात किती तरी चेहरे येतात, जातात. हजारो लोकांशी भेट होते, काही क्षणांसाठी संवाद होतो, काहींना पुन्हा आठवतही नाही. पण कधी कधी मात्र एखादा साधासुधा, अनोळखी वाटणारा चेहरा मनाला भिडतो. काही कारण नसताना तो चेहरा मनाच्या कॅनव्हासवर कायमचा उमटून जातो. खरं तर त्याचं आयुष्यात असणं वा नसणं याने आपल्या दिनचर्येला फारसा फरक पडत नाही, पण मनाच्या गाभाऱ्यात एक अदृश्य नातं जुळतं. जीव लावलेला असतो म्हणून तर त्रास होतो. एखाद्या हास्याने हृदयात हलकेच ठसे उमटतात, एखाद्या नजरेत आपुलकीचा उजेड दिसतो, आणि मन नकळत त्याला खास मानायला लागते. जीव लावण्यामागे तर्क नसतो, कारण नसतं… ती एक हृदयाची सहज प्रतिक्रिया असते. आणि मग हाच जीव लावलेला आपल्याला सुखही देतो, पण त्रासही देतो. कारण जितकी माणसं आपल्याला महत्त्वाची वाटतात, तितकीच त्यांच्या गैरहजेरीची, त्यांच्या दुराव्याची टोचणी जास्त लागते. एक अनोळखी चेहरा उगीच खास का होतो? कदाचित आपण नकळत त्या चेहऱ्यात आपल्या भावनांचा, आपल्या कमतरतेचा, आपल्या अपूर्णतेचा आधार शोधत असतो. म्हणून त्याचं महत्त्व ...

डिजिटल युगातील रिकामे व भरलेले खिसे!

*प्रथम माननिय पुल यांची माफी मागून हा लेख लिहितोय* डिजिटल युगातील रिकामे भरलेले खिसे! ... सुनिल पुणे TM 8007939422 भरलेला खिसा माणसाला "जग" दाखवतो… आणि रिकामा खिसा जगातील "माणसं" दाखवतो, हे तर सगळ्यांनी अनुभवलंय...(पुल) पण आता डिजिटल युग आलंय… इथे खिसा रिकामा असला तरी "फोन" मध्ये GPay, PhonePe, Paytm, UPI QR असला की आपण राजा! कोणी चहा विक्रेता असो किंवा मॉलमध्ये बिलिंग काऊंटर, "भाई, QR स्कॅन करा" म्हणालं की आपलं वर्चस्व टिकून राहतं. पूर्वी ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येत नसे, त्याला विकत घेणं जड जायचं. आता मात्र, धान्य काय  Amazon, Flipkart वर "Add to Cart" करणंही धाडसाचं झालंय. कारण उचलायला पोतं नाही, पण "Pay Now" दाबताना हृदयाचं ठोके मात्र दुप्पट होतात! "विचित्र आहे पण सत्य आहे…" आज ज्याला हवं ते मिळतं, ते Digital Wallet मध्ये मिळतं. UPI Transaction Free असलं तरी, खरी गंमत म्हणजे  Balance Always Zero…! जगाला गंमत आणि देवाला किंमत  दोन्हीच Swipe Machine मध्ये अडकून पडलंय. आता चांगले मित्र आणि औषधं दोन्ही जी...

वयाच्या प्रवासात बदलणारे प्रेमाचे टप्पे...

वयाच्या प्रवासात बदलणारे प्रेमाचे टप्पे...सुनिल पुणेTM 9359850065 माणसाचं वय जसजसं पुढे सरकतं, तसं प्रेमाचं रूपही बदलतं. तरुणपणी आपण डोळ्यांच्या चमकात, चेहऱ्याच्या तेजात, शरीराच्या आकर्षणात प्रेम शोधत असतो. पण आयुष्याचे ऋतू बदलले की हे आकर्षण मागे राहतं, आणि मनाची इच्छा वेगळीच होत जाते, आपल्याला हवं असतं कोणीतरी आपल्या शेजारी, पाठीमागे शांतपणे उभं राहावं, आपल्या थकलेल्या मनाला आधार द्यावा, आणि आपल्या अस्तित्वाला समजून घ्यावं. तरुणाईचं प्रेम म्हणजे एखाद्या वाऱ्याच्या झुळकीसारखं  ताजं, रंगीबेरंगी, हलकंफुलकं. पण वर्षे सरली की तेच प्रेम एका जुना वटवृक्षासारखं होतं  जाते, जिथं सावली मिळते, जिथं सुरक्षितता मिळते, आणि जिथं भूतकाळाच्या गोड आठवणी आणि भविष्याच्या चिंता दोन्हीही  संपतात आणि या टप्प्यावर प्रेमाचं सौंदर्य हे चेहऱ्याच्या गुळगुळीतपणात नसून, डोळ्यांत दिसणाऱ्या विश्वासात असतं. हसरा चेहरा सुरकुतला तरी, प्रियकराच्या दृष्टीत तोच पहिल्यासारखा सुंदर वाटत असतो. वय वाढलं की नात्याचं मोजमाप सुरू होते "तू माझ्यासाठी काय आणतोस" यात नसून "तू माझ्यासोबत आहेस का" यात होतं. हे प्...

ॲल्लोपॅथी विरुद्ध आयुर्वेद मग खरे कोण? सुनिल पुणे TM 8007939422

ॲल्लोपॅथी विरुद्ध आयुर्वेद मग खरे कोण? सुनिल पुणे TM 8007939422 आजच्या काळात एक गंभीर प्रश्न आपल्या समोर उभा राहतो आहे की,  “ॲल्लोपॅथी आणि आयुर्वेद यापैकी खरे कोण?” आपण ज्या भारतभूमीत जन्मलो, तिथे हजारो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी आयुर्वेद ही महान वैद्यकीय परंपरा दिली. आयुर्वेदात रोग मुळाशी जाऊन त्यावर उपाय करण्याची ताकद आहे. आहार, विहार, पंचकर्म, औषधी वनस्पती या सर्वांचा समन्वय करून शरीर-मन-आत्मा या तिन्हींचा समतोल साधण्यावर भर आहे. परंतु आज आपण पाहतो की जगभरात आणि विशेषतः भारतात फक्त ॲल्लोपॅथी हॉस्पिटल्स, औषधनिर्मिती कंपन्या, मेडिकल्स आणि सर्जरी सेंटर्स प्रचंड वेगाने वाढले आहेत. कारण सोपे आहे,  ॲल्लोपॅथी ही ‘रुग्णसेवेपेक्षा इंडस्ट्री’ म्हणून उभी राहिली आहे. काही माझे निरीक्षणे व प्रश्न का ? प्रत्येक शहरात नवनवीन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स उभे राहतात? का ? एखाद्या साध्या आजारासाठीही महागडी तपासणी (MRI, CT Scan, Sonography) आवश्यक केली जाते? का ? औषधे घेतली तरी रोग मुळापासून नाहीसा होत नाही? का ? दरवर्षी नवीन-नवीन रोग जन्म घेत आहेत ? का लोक सर्जरीपर्यंत पोहोचतात, पण त्या आधीचे सोप...

आपल्या विचारांचे बीज हेच आपल्या आयुष्याचे खरे आरसे

आपल्या विचारांचे बीज हेच आपल्या आयुष्याचे आरसे.  सुनिल पुणेTM 8007939422 आपण जे काही झालो आहोत ते आपल्या विचारांचेच फळ आहे. आज आपण ज्या स्थितीत उभे आहोत, ती आपल्या मनात पेरलेल्या विचारांची पिकलेली पिके आहेत. म्हणूनच "मी काय विचार करतो?" हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला दररोज विचारायला हवा. मनुष्याचे आयुष्य हे फक्त त्याच्या कर्तृत्वाने, मेहनतीने किंवा परिस्थितीने बनत नाही; तर त्याच्या विचारसरणीने त्याला दिशा मिळते. स्त्रिया – घराची आणि समाजाची पाया-भिंत असतात. जर स्त्रिया स्वतःच्या मनात सकारात्मक, धैर्यशील, सशक्त विचार ठेवतील, तर त्या घराला आणि समाजाला प्रकाश देतात. "मी हे करू शकते" हा विचारच त्यांना अडचणींवर मात करण्याची ताकद देतो. स्त्रियांच्या विचारांतूनच भावी पिढी घडते. पुरुष – जबाबदारीचे ओझे खांद्यावर घेताना कित्येकदा थकून जातात. पण जर मनात श्रद्धा, संयम आणि सकारात्मकतेचे विचार असतील तर कितीही मोठ्या संकटातही पुरुष मार्ग काढू शकतात. “मी हार मानणार नाही” हा विचार त्याला यशाकडे नेत असतो. मुले – ही कोऱ्या कॅनव्हाससारखी असतात. त्यांना जे विचार, संस्कार दिले जात...

सुनिलच्या लेखणीतील श्रीकृष्ण...

सुनिलच्या लेखणीतील श्रीकृष्ण... ✍🏻 सुनिल पुणे TM 8007939422 कृष्ण म्हणजे एक गूढ, एक अनाकलनीय सत्य, एक शाश्वत आधार... तो राधेच्या हृदयात होता आणि अर्जुनाच्या श्वासातही. राधेसोबत प्रेमाच्या हळुवार बंधनात रमणारा तो, अर्जुनासोबत धर्मयुद्धाच्या रणांगणात स्थिर उभा राहणारा होता...कृष्णाला ठाऊक होतं की राधा त्याची कधीच होणार नाही, आणि अर्जुनाचे यश त्याच्या झोळीत काही आणून देणार नाही. तरीसुद्धा नाती निभावताना त्याने स्वतःचा स्वार्थ कधीच पाहिला नाही. हेच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे विलक्षण वैशिष्ट्य होतं. गोकुळ सोडल्यानंतर राधेकडे परत वळून तो कधीच पाहत नाही. राज्याभिषेकानंतर अर्जुनाच्या जीवनात तो पुनःप्रवेश करत नाही. उत्कट नात्यांना तो पूर्णत्व देतो आणि मग अलगद मागे सरकतो, ना खंत, ना खेद, फक्त समर्पण! ..राधेसाठी त्याची बासरी गात होती, प्रेम, अनुराग आणि माधुर्याचे सूर. आणि त्याच वेळी अर्जुनासाठी त्याची वाणी गीता झाली. कर्तव्य, धर्म आणि रणनितीचा मार्गदर्शन करणारी. बोटे जशी बासरीवर नाचत होती, तशीच ती सुदर्शन चक्रही फिरवत होती. प्रेम आणि रण, माधुर्य आणि कुटनीती, दोन्ही त्याने तितक्याच निपुणतेने जोपास...

कृष्ण पाठीशी हवा...

कृष्ण पाठीशी हवा... ....सुनिल पुणे TM 8007939422 राधेच्या स्वरांत तो, अर्जुनाच्या श्वासात, कधी प्रेमाच्या गाण्यात, कधी रणांगणाच्या तासात. राधा त्याची नव्हती, अर्जुनाचे यश नव्हते, तरी नाती निभावताना स्वार्थ कधीच नव्हते. बासरीच्या सुरांत प्रेम, गीतामृतात उपदेश, सुदर्शनाच्या फिरण्यातही तो करायचा रक्षण विशेष. हळुवार बोटांनी सूर, कधी चक्राची गती, कृष्णात होती प्रेमळता, आणि रणाची निती. नात्यांत निरपेक्ष, मार्गात तो स्थिर, कधी मित्र, कधी गुरु, कधी रणधुरंधर. सुनिल म्हणतो जीवनात, कितीही वादळं आली, कृष्ण पाठीशी असेल तर, प्रत्येक वेदना टळली. प्रेमात तो हृदयाचा स्वर, युद्धात विजयाचा दीप, कृष्णाशिवाय जीवन सारे, अपूर्ण, अधुरं, अती क्षीण. म्हणूनच एकच हाक "सुनिलच्या आयुष्यातही कृष्ण पाठीशी हवा...!" सुनिल पुणेTM 9359850065, sunilpunetm.blogspot.com

सरळ बांबू आधीच कापतात… तसेच चांगले वागणार्‍या माणसांचे ही होत

"सरळ बांबू आधीच कापतात… तसेच चांगले वागणार्‍या माणसांचे ही होत" लेखक सुनिल पुणेTM 8007939422 तिच्या डोळ्यांत एक वेगळंच तेजोमय  मिश्रण होतं,  आठवणींचं ओलसर पाणी आणि मनात साठलेली खंत. ती म्हणाली, "मला नेहमी वाटायचं, आपण मनापासून, चांगुलपणाने सर्वांशी वागलो की जगही आपल्याशी तसंच वागेल. लोक म्हणतात ना, ‘जग आपल्याला तसंच परत देतं, जसं आपण देतो.’ पण खरी गोष्ट काय आहे, माहिती आहे का? आपण जेवढं चांगलं वागतो, तेवढाच आपला गैरफायदा घेतला जातो. जणू कधी ही सरळ बांबू आधीच कापला जातो, वाकडा राहतो तो वाचतो." तिचं हे बोलणं ऐकताच मनात एक टोचणी लागली. आयुष्यात कित्येक वेळा आपणही असं अनुभवलेलं असतं. कोणाला मनापासून आर्थिक व इतर मदत केली, त्यांचा विचार करून स्वतःचं नुकसान ही सहन केलं, आणि शेवटी परत काय मिळालं? तर फक्त विसरले जाणं… कधी कधी तर पाठीमागे निंदा नालस्ती व वाईट बोलली जाणारी चुकीची वाक्यंही असतात.. चांगुलपणा हा दोष नसतो, पण त्याला कवच लागतं ते  अनुभवाचं. ज्यांच्यासाठी आपण झिजतो, त्यांची खरी ओळख वेळेनेच करून दिली पाहिजे. कारण जगात सगळेच लोक आपल्या मनासारखे नसतात; काही केवळ आपल्य...

प्रेम भंग

सर्वस्व देऊनसुद्धा जेव्हा बदल्यात परकेपणा मिळतो ना… तेव्हा ती टोचणी फक्त हृदयाला लागत नाही, तर आत्म्याच्या खोलवर जाऊन बसते. कारण इथे नुकसान फक्त वेळेचं किंवा श्रमाचं नसतं, ते नुकसान असतं विश्वासाचं, अपेक्षांचं आणि आपल्या प्रेमाच्या पवित्रतेचं. आपण एखाद्यासाठी पूर्ण मनाने, निस्वार्थपणे सर्व काही देतो… वेळ, आधार, प्रेम, कधीकधी आपली स्वप्नेसुद्धा. आणि मनाच्या आत कुठेतरी एक छोटीशी आशा असते की बदल्यात थोडी आपुलकी, समजूत, जवळीक मिळेल. पण जेव्हा उत्तरात मिळतो फक्त थंडपणा, दुरावा किंवा परकेपणा, तेव्हा त्या क्षणी मनाला शब्दात न मांडता येणारा धक्का बसतो. अशा जखमा काळाने सहज बऱ्या होत नाहीत. कारण त्या फक्त आठवण नसतात, तर त्या सतत आठवण करून देतात की आपल्यासाठी इतकं मोठं असलेलं कोणाच्यातरी नजरेत अगदीच नगण्य होतं. मनाला सतत प्रश्न पडतो, “मी काय चुकलो? माझ्या प्रेमात कमीपणा होता का?” आणि उत्तर शोधता शोधता माणूस स्वतःलाच दोष द्यायला लागतो. पण खरं सांगायचं तर अशा वेळी वेळेपेक्षा जास्त गरज असते स्वतःला पुन्हा नव्याने उभं करण्याची. स्वतःला पटवून देण्याची की आपलं दिलेलं प्रेम कधीच व्यर्थ नसतं. त्यांनी ...

"मनाची राख" –एक जिवंत दर्दभरी कहाणी...

"मनाची राख" –एक जिवंत दर्दभरी कहाणी... (एका महिलेच्या अंतर्मनातून) सुनिल पुणेTM 8007939422 "लोकांना वाटतं फसवणूक म्हणजे फक्त शब्दांचा खेळ असतो… पण खरं तर ती आत्म्यात घुसलेली जखम असते, जी आयुष्यभर भरत नाही." मी एक साधी, घरगुती मुलगी होते. प्रेम माझ्यासाठी देवासारखं पवित्र होतं. त्याची पहिली नजर… पहिलं बोलणं… जणू एखाद्या कवितेचा पहिला शब्द. तो मला म्हणायचा  "तुझ्या डोळ्यांत मला माझं घर दिसतं." आणि मी विश्वास ठेवायची. आमचं लग्न झालं त्या दिवशी, माझ्या मंगळसूत्राचा प्रत्येक मोती मला सांगत होता  "आता तू सुरक्षित आहेस… त्याच्या सोबत तुझं सगळं आयुष्य सुखाचं जाईल." पहिले काही महिने स्वप्नासारखे गेले. तो माझा हात धरून म्हणायचा  "तू माझ्यासोबत असलीस ना, तर मी जग जिंकू शकतो." मी त्याच्यासाठी सर्व काही दिलं, माझं करियर, माझा वेळ, माझं मन, माझी स्वप्नं… पण हळूहळू बदल सुरू झाले. तो उशिरा घरी यायला लागला. फोनवर लांब लांब मेसेज, माझ्या समोर असताना पण मन कुठेतरी दुसरीकडे. मी विचारायची  "सगळं ठीक आहे ना?" तो रागाने म्हणायचा  "तू काहीही समज...

मैत्रिण, प्रेमिका, प्रियकर व दोस्त यांची सोबत – सध्याच्या काळातील खरी किंमत

मैत्रिण, प्रेमिका, प्रियकर व दोस्त यांची सोबत – सध्याच्या काळातील खरी किंमत लेखक – सुनील पुणे TM आजच्या धावपळीच्या, तणावाच्या आणि स्पर्धेच्या काळात नात्यांचा खरा अर्थ थोडा धूसर झालाय. मोबाईल, सोशल मीडिया, आणि आभासी जग आपल्याला हजारो लोकांशी जोडतं, पण खरी सोबत देणारे काहीच लोक असतात. हे लोकच आपल्या आयुष्याचे खरे आधारस्तंभ असतात – मग ती जिवलग मैत्रीण असो, आपली प्रेमिका किंवा प्रियकर असो, किंवा हक्काचा दोस्त असो. कठीण काळात आपण खचून गेलो असताना आपल्या खांद्यावर ठेवलेला एक हात, आणि “मी आहे तुझ्यासोबत” असं मनापासून सांगणारे चार शब्द… हे विजयानंतर मिळालेल्या टाळ्यांपेक्षा कितीतरी पटीने मौल्यवान असतात. कारण टाळ्या फक्त क्षणभराचा आनंद देतात, पण संकटात दिलेला आधार आयुष्यभराची उर्जा देतो. सध्याच्या काळात अनेकदा लोक सोबत देतात, पण त्यात खरी भावना कमी असते. फोटो पोस्ट करून “सोबत आहे” असं दाखवणं सोपं झालंय, पण संकटात खरेच तुमच्यासाठी उभं राहणं मात्र प्रत्येकाला जमत नाही. खरी सोबत म्हणजे फक्त आनंदात हसणं नव्हे, तर दुःखात, गोंधळात आणि अपयशात न तुटता तुमच्यासाठी उभं राहणं. ज्यांनी तुम्हाला संकटात ...

लघुकथा

*लघुकथा*  आज मी जरा वेगळाच कथा प्रपंच करतोय, नक्की वाचा, आवडले तर अभिप्राय सर्वानीच द्यावा, कारण सर्वासाठी लघुकथा आहेत. सुनिल पुणेTM 8007939422 भाऊ–बहीण १. लहानपणी भांडण झाल्यावर मी बहिण रुसवून बसत असे. आज ती माहेरी आली तेव्हा तिचा मुलगा माझ्या मांडीवर बसला. बहिणीच्या डोळ्यात पाणी होतं, म्हणाली, “तुझ्याशी रुसणं आता कुठे जमणार रे?” २. रक्षाबंधनाला मी तिला विचारलं, “या धाग्याचं एवढं महत्त्व का?” ती हसली, “हा धागा नाही रे, हे आईबाबांचं हृदय आपल्यामध्ये गुंडाळलेलं आहे.” प्रेमी–प्रेमिका ३. ती म्हणाली, “तू खूप बदललास रे.” मी हसत म्हणालो, “तुझ्या प्रत्येक स्वप्नाशी जुळण्यासाठी रोज बदलत असतो ग.” ४. पावसात चालताना तिने विचारलं, “आपण कायम असंच एकत्र राहू ना ?” मी तिचा हात घट्ट धरला आणि पावसाचा आवाज थांबेपर्यंत उत्तर दिलंच नाही… कारण कधी कधी मौन च सर्वात मोठं ‘हो’ असतं. मित्र–मैत्रीण ५. कॉलेजचा जुन्या मित्राला प्रथमच भेटलो. त्याने पहिलाच प्रश्न विचारला, “आठवतोस का तो अपूर्ण जोक?” आणि पुढची एक तासभराची हसण्याची मैफल जणू सगळे वर्षांचे अंतर पुसून गेली. ६. ती म्हणाली, “आता आपण बोलत नाही तितकं पुर...

हक्काचं घर... एका स्त्रीच्या अंतर्मनाची मनस्वी आशादायक हाक

हक्काचं घर... एका स्त्रीच्या अंतर्मनाची मनस्वी आशादायक हाक, शब्दांकन सुनिल पुणे TM 8007939422 ती जन्मते, नाजूकसा श्वास घेते, आईच्या कुशीत विसावते. पण जन्माच्या क्षणापासूनच तिच्या वाट्याला येतो "परके पणाचे घर"... घरात लाडकी असते, पण तिचं अस्तित्व एका वाक्यात बांधलं जातं "आपली मुलगी परक्याच धन" म्हणजेच काय तर तिचं बालपणही एका उधारीच्या सावलीत जातं... ती हसते, शिकते, स्वप्नं बघते... पण सगळ्या स्वप्नांचं उत्तर एकच  "सासर म्हणजेच तिचं खरं घर!" पण जेव्हा ती सासरी जाते, तिथंही तिला घर सापडत नाही...कारण इथं ती सून असते, बायको असते, पुढे आई बनते...पण कधीच "फक्त ती" म्हणून ओळखली जात नाही. तिचं अस्तित्व नेहमी नात्यांच्या नावाने ओळखलं जाते  कुणाची तरी 'लेक', कुणाची तरी 'सून', कुणाची तरी 'आई'...आजी व सासु पण ती कधी विचारते का स्वतःला  "माझं हक्काचं घर नक्की कुठे आहे?" कुठे आहे तो कोपरा, जिथे ती आवाज न वाढवता रडू शकते? जिथे तिला उत्तर न देता फक्त शांतपणे समजून घेतलं जातं? जिथे ती तिच्या झालेल्या चुकांसकट स्वीकारली जाईल...? खरं...

एक स्त्रीचं मनोगत, समाजाच्या चौकटीत अडकलेलं स्वत्व, माझ्या शब्दातून, नक्की अभिप्राय द्यावा,

एक स्त्रीचं मनोगत,  समाजाच्या चौकटीत अडकलेलं स्वत्व, माझ्या शब्दातून, नक्की अभिप्राय द्यावा, सुनिल पुणे TM 8007939422 आजच्या डिजिटल युगात आपण विज्ञानात, तंत्रज्ञानात आणि जीवनशैलीत झपाट्याने पुढे जात आहोत, पण मनोवृत्तीत होणारा बदल मात्र काही ठिकाणी आजही घसरतो आहे. विशेषतः त्या स्त्रीबाबत जी आपल्या आयुष्यातील जोडीदार जेव्हा गमावते तेव्हा हा समाज तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही काळोखात अडकलेला विचारांचा आहे. ती स्त्री एक दु:खद वळण अनुभवून पुढे चालते आहे, पण समाज मात्र तिला वेगळी ओळख लावून तिचं माणूसपण, तिचं स्त्रीत्व कमी करत जातो. ती सण-समारंभात सहभागी झाली, तर काही लोकांच्या कपाळावर आठ्या येतात. धार्मिक कार्यक्रमात तिचं असणं "अपशकुन" मानणारी मानसिकता अजूनही काही घरांत खोलवर रुजलेली आहे. ती स्त्री एकटी राहू लागली की काहीजण तिला सहानुभूतीच्या नजरेतून पाहतात, तर काहीजण संधीचं साधन म्हणून. समाजाची नजर, टोमणे, आणि नकारात्मक वागणूक यामुळे तिचं दुःख दुप्पट होतं. इतकंच काय, तिच्या दुसऱ्या विवाहाचा विचार जरी तिने केला, तरी तिला "हक्काने" ते करण्याचा अधिकार कुणीच सहज देत न...

एका विधवेचे मनोगत माझ्या शब्दातून..समाजाची बेडी आणि अस्तित्वाची लढाई...

एका विधवेचे मनोगत माझ्या शब्दातून..समाजाची बेडी आणि अस्तित्वाची लढाई... सुनिल पुणे TM 8007939422. आज आपण 21व्या शतकात जगतो आहोत, डिजिटल युगात वावरतो, मोबाईलवरून जग चालवतो, पण दुःखाची गोष्ट ही आहे की, आपल्या समाजात विधवा स्त्रीच्या वाट्याला येणारे दु:ख अजूनही मध्ययुगीन काळासारखेच आहे. पती गमावल्यावर स्त्रीचं आयुष्य संपत नाही, पण समाज मात्र तिला जणू "पूर्ण झालीस आता" अशा नजरेने पाहतो. तिचं दुःख समजून घेण्याऐवजी तिला धार्मिक कार्यक्रमांपासून दूर ठेवलं जातं. सणसमारंभात तिची उपस्थिती "अपशकुन" समजली जाते. आजही काही घरांत ‘ती विधवा आहे, त्यामुळे ती पूजा करू नये, हळदीला येऊ नये’ असे नियम ऐकायला मिळतात. ही गोष्ट केवळ वेदनादायक नाही, तर लज्जास्पद आहे. इतकंच नव्हे, तर माहेरची माणसेही काही काळानंतर हात झटकतात. आधी जे आधार वाटायचे, ते हळूहळू निघून जातात. आणि मग उरते एकटेपणाची काळोखी खोली. या स्त्रीच्या आयुष्यात जर दुसऱ्यांदा प्रेम, साथ, आधार यांची ओढ निर्माण झाली तर...? तर त्या वाटेलाही समाज अडथळे उभे करतो. विधुर पुरुष जर दुसऱ्या लग्नासाठी पुढे आला, तर त्याला तरुण, सुंदर, समजूतद...

प्रेमसंबंध नष्ट करणाऱ्या सवयी आणि प्रेमभंगाची कारणे एक विचारमंथन,

प्रेमसंबंध नष्ट करणाऱ्या सवयी आणि प्रेमभंगाची कारणे एक विचारमंथन, लेखन: सुनिल पुणे TM 8007939422 प्रेम… हा शब्द ऐकला की मनात एक मधुर भावना जागृत होते. दोन व्यक्तींच्या हृदयाचा, विचारांचा, आणि आत्म्याचा एक गोड मिलाफ म्हणजेच प्रेम. पण हे प्रेम टिकवणं जितकं सुंदर, तितकंच कठीणही. अनेकदा आपण प्रेमात असतो, पण नकळत काही वागणुकीमुळे, सवयींमुळे ते नातं हळूहळू विघटित होतं. जेव्हा नातं संपतं, तेव्हा फक्त एक व्यक्ती नाही, तर संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. चला, अशा सवयींवर आणि प्रेमभंगाच्या मुख्य कारणांवर एक दृष्टिक्षेप टाकूया: अविश्वासाची सुरुवात प्रेमाचा पाया म्हणजे विश्वास. पण सतत शंका घेणे, मोबाईल तपासणे, कुठे गेलास? कोणासोबत होतास? असे प्रश्न विचारणे नात्यात फट पाडतात. जिथे विश्वास नाही, तिथे प्रेम टिकत नाही. भावनांची अनास्था समोरच्या व्यक्तीच्या भावना, गरजा, मनोवस्था न समजून घेणे हे प्रेमासाठी घातक ठरते. "मला काय त्याचं!" असा विचार हळूहळू दुरावा निर्माण करतो. सतत टीका करणे किंवा कमी लेखणे प्रेमात आदर हवा. सतत दुसऱ्याच्या चुका काढणे, त्याचं अपमानास्पद बोलणं, हिणवणं हे आत्मविश्वासच मोडतो...

स्त्रीच्या मनातील खोल सागरातील खळबळ, एक अंतर्मनोगत

स्त्रीच्या मनातील खोल सागरातील खळबळ,  एक अंतर्मनोगत लेखन सुनिल पुणे TM 8007939422 मी एक साधी, सामान्य स्त्री आहे. शिक्षण झालं, सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करत मोठी झाले. स्वप्न होतं प्रेमाचं, संसाराचं, आणि आपल्या माणसांत जगण्याचं. पण हे स्वप्नच होतं... वास्तव वेगळंच होतं.  लग्न झालं... पण ते प्रेमाचं नव्हतं की समजूतदारपणाचं नव्हतं. ते एक सामाजिक करार होतं. समाज म्हणतो, वय झालं  म्हणजे लग्न झालंच पाहिजे. लग्नात 'मुलगी पाहून योग्य स्थळी दिली' असं सगळ्यांना वाटलं... पण माझं मन कुणी पाहिलं का हो ? माझ्या स्वभावाशी, मनोवृत्तीशी तो माणूस नवरा किती वेगळा होता हे कुणी समजून घेतलं का हो ? त्याचं वागणं... बोलणं... मन दुखावत राहिलं. तो नवरा होता पण 'जीवनसाथी' नव्हता. माझ्या भावना, माझं अस्तित्व, माझी माणूस म्हणून गरज... याला काहीच स्थान नव्हतं त्या नात्यात. शारीरिक, मानसिक त्रास झाला तरी आई-बाबा म्हणाले होते, "सहन कर. समाज काय म्हणेल?" समाज काय म्हणेल हे वाक्य एवढं मोठं झालं, की माझं दुःख पण छोटं पडलं. आज मी जगते पण एक मोलकरीण बनून. नवऱ्याच्या घरात, मुलांच्या जबाबदाऱ्या सा...

"संसार, प्रेम आणि संस्कार: एका स्त्रीच्या अंतर्मनाची खरी व आपबिती कहाणी"

"संसार, प्रेम आणि संस्कार: एका स्त्रीच्या अंतर्मनाची खरी व आपबिती कहाणी"  लेखक सुनिल पुणे TM 8007939422 ती एक सामान्य स्त्री आहे. पण तिचं मन? एक अश्रूंनी भरलेलं समुद्र! लग्न झालं...ते मोठ्या अपेक्षांनी, नव्या स्वप्नांनी. पण लवकरच स्वप्नांची राख झाली. तिचा पती, जो तिच्या सुखदुःखाचा सोबती व्हावा पण तोच तिचा संसार नुसता जबाबदारी बनवून बसला. प्रेम, जिव्हाळा, संवाद सगळं हरवून गेलं. ती फक्त "एक पत्नी" म्हणूनच उरली नाही... तर एक मोलकरीण, एक यंत्र, एक बिनआवाजी सावली झाली...ती कोणाला सांगू शकत नाही... कारण समाज ऐकतो, पण समजून घेत नाही...आई-वडिलांना त्रास नको, मुलांचं भविष्य धोक्यात नको… आणि वरून ‘समाज काय म्हणेल?’ ह्या एकाच प्रश्नाने तिची जीभ कायमची गप्प! आज ती जगते पण स्वतःसाठी नाही. संसारासाठी, जबाबदाऱ्यांसाठी, आणि ‘स्त्रीधर्मा’साठी. मुलं झाली, थोडं समाधान मिळालं... पण तरीही मनामधील उपासमार कायम राहिली. दिवस सरत गेले, आणि हळूहळू ती स्वतःलाच विसरली....आणि एक दिवस, अचानक तिच्या आयुष्यात तो आला. एक अनोळखी पण जिव्हाळ्याचा हात. कोणतंही मागणं न करता, तिला फक्त "तिच्या"...