आपल्या विचारांचे बीज हेच आपल्या आयुष्याचे खरे आरसे
आपल्या विचारांचे बीज हेच आपल्या आयुष्याचे आरसे. सुनिल पुणेTM 8007939422
आपण जे काही झालो आहोत ते आपल्या विचारांचेच फळ आहे. आज आपण ज्या स्थितीत उभे आहोत, ती आपल्या मनात पेरलेल्या विचारांची पिकलेली पिके आहेत. म्हणूनच "मी काय विचार करतो?" हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला दररोज विचारायला हवा.
मनुष्याचे आयुष्य हे फक्त त्याच्या कर्तृत्वाने, मेहनतीने किंवा परिस्थितीने बनत नाही; तर त्याच्या विचारसरणीने त्याला दिशा मिळते.
स्त्रिया – घराची आणि समाजाची पाया-भिंत असतात. जर स्त्रिया स्वतःच्या मनात सकारात्मक, धैर्यशील, सशक्त विचार ठेवतील, तर त्या घराला आणि समाजाला प्रकाश देतात. "मी हे करू शकते" हा विचारच त्यांना अडचणींवर मात करण्याची ताकद देतो. स्त्रियांच्या विचारांतूनच भावी पिढी घडते.
पुरुष – जबाबदारीचे ओझे खांद्यावर घेताना कित्येकदा थकून जातात. पण जर मनात श्रद्धा, संयम आणि सकारात्मकतेचे विचार असतील तर कितीही मोठ्या संकटातही पुरुष मार्ग काढू शकतात. “मी हार मानणार नाही” हा विचार त्याला यशाकडे नेत असतो.
मुले – ही कोऱ्या कॅनव्हाससारखी असतात. त्यांना जे विचार, संस्कार दिले जातात, त्यावर त्यांचे भविष्य उभे राहते. जर मुलांच्या मनात प्रामाणिकपणा, धैर्य आणि मेहनतीचे विचार पेरले, तर त्यांचे व्यक्तिमत्त्व उज्ज्वल होते.
मुली – समाजातील बदलाची खरी वाहक. जर मुलींनी "मी सक्षम आहे, मी समाजात माझे स्थान निर्माण करू शकते" हा विचार जोपासला, तर त्या फक्त स्वतःच नव्हे तर इतरांनाही प्रेरणा देतात.
म्हणूनच प्रत्येकासाठी महत्वाचे हे आहे की
- नकारात्मक विचारांना मनात जागाच देऊ नका.
- सकारात्मकता आणि आशावाद यांचे बीज दररोज मनात पेरा.
- विचार जसे, तसे आयुष्य होते.
जीवनात बाह्य परिस्थिती बदलता येत नाही, पण आपल्या मनातील विचार नक्की बदलता येतात. आणि हेच बदललेले विचार आपल्या आयुष्याचा चेहरा बदलतात.
म्हणून एक लक्षात ठेवा
"आपल्या विचारांची बीजेच आपल्या आयुष्याचे फळ ठरवतात."
सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment