मैत्रीची ओलसर गोडी....!
मैत्रीची ओलसर गोडी....!
सुनिल पुणेTM 8007939422
कोणी म्हणतं “मैत्री बरबादी आहे ? ” पण खरं सांगायचं झालं, निभावणारे जर भेटले, तर तीच मैत्री आयुष्यभर हृदयाला ओलावा देत राहते.
पुरुष असो वा स्त्री, प्रत्येकाच्या मनात काही अशा भावना असतात ज्या जगासमोर उघडता येत नाहीत. त्या भावना समजून घेणारा, त्या ऐकून घेणारा जर खरा मित्र मिळाला, तर मग आयुष्य कितीही कठीण असलं तरी सोपं वाटतं.
स्त्रीची सखी असते जी तिचं मन मोकळं करते, तिच्या अश्रूंना जपते, तिच्या हसण्यातली खरी चमक ओळखते. पुरुषाची दोस्ती असते जी त्याला खांद्यावर हात ठेवून चालायला लावते, पडला तर उचलते, यशात टाळ्या वाजवते आणि अपयशात ढाल बनून उभी राहते.
पण खरी मैत्री फक्त स्त्री-स्त्री किंवा पुरुष-पुरुष यांच्यातच नसते. एक स्त्री आणि एक पुरुष यांच्यातही शुद्ध, प्रामाणिक मैत्री असते. जिथे कुठलाही स्वार्थ, कुठलीही शर्त नसते. फक्त मनाशी जोडलेला धागा असतो. तो धागा इतका नाजूक तरीही इतका मजबूत असतो की तो काळाच्या कसोटीवरही टिकतो.
आज सोशल मीडियाच्या या युगात नात्यांची देवाण-घेवाण पटकन होते, तुटतेही पटकन. पण खरी मैत्री तीच जी समजून घेते, जपते आणि काळाच्या ओघात अजून दृढ होत जाते.
म्हणूनच सांगावंसं वाटतं की,
"कोण म्हणतो मैत्री बरबाद आहे? खरं तर निभावणारे जर सापडले, तर हीच दुनिया त्या मैत्रीची उदाहरणं देत आठवण ठेवते."
सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment