Posts

Showing posts from January, 2026

प्रेमळ मिठी शब्दापलिकडली

शब्दांच्या पलीकडली प्रेमळ मिठी...लेखक सुनिल जाधव पुणे, 9359850065 नात्यांच्या गर्दीत, शब्दांच्या गोंगाटात आणि अपेक्षांच्या ओझ्यात कधी कधी प्रेम इतकं साधं असतं की ते दिसतही नाही. ते घोषणा करत नाही, वचनांची रांग लावत नाही, किंवा मोठ्या शब्दांत स्वतःची जाहिरात करत बसत नाही. ते शांत असतं. खोल असतं. आणि नेमक्या क्षणी, अगदी न बोलताच, ते आपली उपस्थिती सांगून जातं. कारण काही भावना शब्दांच्या पुढे असतात. त्या अनुभवायच्या असतात, ऐकायच्या नाहीत. आपण आयुष्यभर मजबूत राहण्याचा प्रयत्न करत असतो. कोणासाठी तरी आदर्श बनण्यासाठी, कोणासाठी तरी आधार बनण्यासाठी, तर कधी स्वतःलाच सिद्ध करण्यासाठी. रोज सकाळी उठून चेहऱ्यावर एक हसरा मुखवटा चढवतो आणि आतल्या थकव्याला, भीतीला, गोंधळाला मागे ढकलतो. “मी ठीक आहे” हे वाक्य इतकं सवयीचं होतं की खरं काय आहे हे आपणच विसरून जातो. अशा वेळी प्रेम जर विचारत बसलं, “काय झालं?” तर उत्तर द्यायला शक्तीही उरत नाही. तेव्हा प्रेमाने फक्त जवळ यावं, घट्ट धरावं, आणि काही न विचारता सांगावं, “मी इथे आहे”, इतकंच पुरेसं असतं. योग्य व्यक्तीची मिठी ही केवळ शरीरांची जवळीक नसते. ती मनाच्या कप्प्...

ठेवलेली बाई "रखैल "

"ठेवलेली बाई, "रखैल"" इज्जत नेमकी कोणाची? नैतिकतेचा भार फक्त स्त्रीवरच का? लेखक: सुनिल जाधव पुणे 9359850065. समाज काही शब्द वापरतो आणि त्या शब्दांसोबतच एखाद्या माणसाचं आयुष्य, अस्तित्व, भावना आणि स्वाभिमान एका क्षणात संपवून टाकतो. “ठेवलेली बाई” (रखैल) हा त्यातलाच एक शब्द आहे. हा शब्द ऐकताच समाजाचा चेहरा बदलतो,  सुर बदलतो, विचार बदलतात. त्या स्त्रीबद्दल निर्णय आधीच झालेला असतो, ती चुकीची आहे, चारित्र्यहीन आहे, नैतिकतेच्या चौकटीबाहेर गेलेली आहे. पण या संपूर्ण प्रवासात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, पुरुष मात्र नेहमीच मोकळा, निष्पाप राहतो. त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहत नाही पण बदनामीचा, लाजेचा, अपमानाचा संपूर्ण भार एकट्या स्त्रीवर टाकला जातो. खरं तर प्रश्न 'ठेवलेली बाई' या शब्दाचा नाही, प्रश्न आहे समाजाच्या दुटप्पी विचारांचा. प्रश्न आहे त्या मानसिकतेचा, जिथे स्त्री ही अजूनही स्वतंत्र माणूस नसून एखादी मालमत्ता, जबाबदारी किंवा नियंत्रणात ठेवायची गोष्ट समजली जाते. समाज विसरतो की ही स्त्रीसुद्धा माणूस आहे, तिला मन आहे, भावना आहेत, स्वप्नं आहेत, गरजा आहेत. महत्त्वाचा...

आयुष्यभर प्रत्येक टप्प्यावर वाचावा असा लेख लिहिण्याचा प्रथम प्रयत्न, लेखक: सुनिल जाधव पुणे, 9359850065.

आयुष्यभर प्रत्येक टप्प्यावर वाचावा असा लेख लिहिण्याचा प्रथम प्रयत्न, लेखक: सुनिल जाधव पुणे, 9359850065. “व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजास्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे सर्वाचेच आयुष्य…!” हा सुविचार किवा फक्त एक वाक्य नाही, तर संपूर्ण आयुष्याचा आरसा आहे. आयुष्य नावाचा हा चित्रपट कुठल्याही स्क्रिप्टशिवाय सुरू होतो, कुठे संपेल याची कल्पनाही देत नाही आणि आपण त्यात प्रमुख भूमिकेत असलो तरी दिग्दर्शक मात्र कायम अदृश्य असतो. प्रत्येक जण आपल्या स्वभावानुसार भूमिका करायला जन्माला येत नाही; अनेक वेळा परिस्थिती आपल्याला अशा भूमिका देते ज्या आपल्या मनाला, विचारांना, मूल्यांना शोभणाऱ्या नसतात. तरीही त्या कराव्याच लागतात… कारण आयुष्य ‘कट’ म्हणण्याची परवानगी देत नाही. अविवाहित असताना माणूस स्वप्नांच्या भूमिकेत असतो. स्वतःसाठी जगायचं, मनाप्रमाणे निर्णय घ्यायचे, उडायचं, धावायचं, चुकायचं… पण इथेही आयुष्य पटकन आपली पटकथा बदलतं. कुटुंबाच्या अपेक्षा, समाजाचे निकष, नात्यांची बंधनं, या सगळ्यांमुळे कधी कधी जबाबदारीची भूमिका लवकरच गळ्यात पडते. मन अजून बालिश असतानाच प...

आयुष्याचा प्रवास : न विचारता दिलेलं तिकीट....सुनिल जाधव पुणे, 9359850065

आयुष्याचा प्रवास : न विचारता दिलेलं तिकीट....सुनिल जाधव पुणे, 9359850065 आपण जन्माला येतो तेव्हा कुणी आपल्याला विचारत नाही, “तुला कुठे जायचं आहे?” हातात एक तिकीट दिलं जातं… गाडी सुरू असते… आणि नाव असतं, आयुष्य. या प्रवासात प्रत्येकजण प्रवासी असतो, पण कुणाचं तिकीट जनरलचं असतं, कुणाचं स्लीपरचं, तर कुणी एसीत बसलेला असतो. गाडी मात्र सगळ्यांसाठी तीच असते. कुणी खिडकीजवळ बसलेला असतो, बाहेरचं सौंदर्य पाहतो. कुणी उभा असतो, फक्त तोल सांभाळत असतो. कुणी सीट असूनही अस्वस्थ असतो, तर कुणी जमिनीवर बसूनही शांत असतो. इथेच आयुष्याचा पहिला धडा मिळतो, सुख ही जागेवर नाही, तर दृष्टीवर अवलंबून असतं. अविवाहित माणूस या प्रवासात सतत पुढच्या स्टेशनकडे पाहत असतो. “पुढे काय असेल?” “माझा थांबा कुठला?” त्याच्या हातात वेळ असतो, पण दिशेची खात्री नसते. तो खिडकीतून स्वप्नं पाहत राहतो, पण अचानक एखाद्या स्टेशनवर गाडी थांबते, जबाबदारी नावाचं. तेव्हा कळतं, प्रवास फक्त पाहण्यासाठी नसतो, तर निभावण्यासाठी असतो. विवाहित माणूस मात्र दोन तिकिटांसह प्रवास करतो. त्याचं सामान दुप्पट असतं, स्वतःचं आणि दुसऱ्याचं. कधी गाडी हलते तेव्हा स...