"जब तक जिंदा था, मै मरा नही, जब मर गया, तो मै ही नही..."
लेख शीर्षक: "जब तक जिंदा था, मै मरा नही, जब मर गया, तो मै ही नही..." लेखक: Sunil Pune TM 8007939422 आजच्या मोबाईलच्या दुनियेत माणूस जिवंत असूनही हरवलेला आहे. कोणाशी संवाद नाही, नजरेला नजर नाही, आणि हृदयाला हृदयाची उब नाही. प्रत्येकजण स्क्रीनमध्ये इतका गुंतलेला आहे की, आसपासचे आयुष्य त्याच्या नकळत निघून जातं. एक काळ होता, जेव्हा माणसं एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत होती. आज मोबाईल आहे, पण "माणूस" नाही. शेजारचा माणूस आजारी आहे की एकटं पडलेला आहे, हे कळतच नाही, कारण आपली नजर Instagram च्या स्टोरीवर आहे. आपली Sympathy सुद्धा "Like" किंवा "Emoji Reaction" इतकीच मर्यादित राहिली आहे. "जब तक जिंदा था, मै मरा नही" — यात खरं आत्मभान आहे. जिवंत असतानाच माणूस आत्म्याने जिवंत असावा. संवेदना, संवाद, सहवास — हेच खरी माणुसकीची लक्षणं. "जब मर गया, तो मै ही नही" — माणूस गेला की, त्याचे status updates थांबतात, फोन silent होतो, पण खरं आयुष्य... ते आधीच संपलेलं असतं, फक्त त्याला कळत नाही. मोबाईल वापरा — पण आयुष्य विसरू नका. डिजिटल रहा — पण हृदया...