क्षणभर टोचणारी सुई आणि आयुष्यभर जोडणारा धागा !
*क्षणभर टोचणारी सुई आणि आयुष्यभर जोडणारा धागा ! ✍️ सुनिल पुणे TM* जीवनात आपल्याला दोन प्रकारचे अनुभव येतात—एक असे, जे क्षणभर टोचतात आणि दुसरे असे, जे आयुष्यभर आपल्याला जोडून ठेवतात. दुर्दैवाने, माणसाला त्या क्षणभर टोचणाऱ्या गोष्टीच अधिक लक्षात राहतात, तर जीवनभर जोडणाऱ्या गोष्टींना तो दुर्लक्षित करतो. एक साधा विचार करूया—जेव्हा आपण कपड्याला शिवण घालतो, तेव्हा सुई टोचल्याचा त्रास होतो. पण ती सुई जर नसेल, तर धागा कसा ओवला जाईल? त्या टोचण्याच्या वेदनेशिवाय शिवण पूर्णच होऊ शकत नाही. मात्र, जेंव्हा ते कपडे तयार होतात, तेव्हा आपल्याला ती सुई नव्हे, तर त्या शिवणीत वापरलेला धागा महत्त्वाचा ठरतो, जो आपले कपडे घट्ट पकडून ठेवतो. माणसांचे नातेसंबंधही असेच असतात. काही लोक क्षणभर टोचणाऱ्या टीका करतात, चुकांची जाणीव करून देतात. पण त्यांच्या शब्दांमधून शिकण्याची आणि सुधारणेची संधी असते. दुसरीकडे, काही लोक आयुष्यभर आपल्या सोबत असतात, आधार देतात, मार्गदर्शन करतात—हेच खरे जोडणारे धागे असतात. समाजात आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यातही आपण काय लक्षात ठेवतो हे महत्त्वाचे असते. काही क्षणभर दुखावणाऱ्या गोष्टीं...